शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

'भारत माता की जय' म्हणणारेच देशात राहतील : धर्मेद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 17:15 IST

भारतात राहायचे असेल तर भारतमाता की जय म्हणावेच लागेल असे वक्तव्य केंद्रीय पेट्राेलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी पुण्यात केले.

पुणे: ‘भारतात भारत माता की जय म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच लोक देशात राहतील. तसेच जो येईल तो येथेच राहणार आहे का? भाारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का ? याचा विचार करावाच लागेल.’असे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी केले.  

अखिल भारतीय विद्याार्थी परिषदेच्या (अभाविप) ५४ व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी प्रधान बोलत होते. कार्यक्रमास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, प्रदेश प्रमुख डॉ. प्रशांत साठे, महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी,अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव राजेश पांडे, पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे आदी उपस्थित होते.

नागरिकत्व कायद्यााला होत असलेल्या विरोधावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना धर्मेद्र प्रधान म्हणाले, देशाचे तुकडे करणाऱ्या कंपूकडून नागरिकत्व कायद्याला, नागरिकत्व नोंदवहीला देशभरातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांतून विरोध केला जात आहे. नागरिकत्व कायद्याबाबत विनाकारण प्रश्न उपस्थित करून अपप्रचार केला जात आहे.जगातील सर्व देशांमध्ये नागरिकत्व कायदे लागू असून  काही देशांमध्ये तर, शासनाला याबाबत प्रश्नही विचारता येत नाही.परंतु, देशामध्ये बौद्धिक ठेकेदारी आपल्याकडेच आहे, असे काहींना वाटते. या लोकांकडून कायद्याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत कशी होते? याबाबत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे.

गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांनी शारीरिक आव्हानांवर मात करत एव्हरेस्ट शिखर कसे सर केले याबाबतचा अनुभव विद्याार्थ्यांना सांगितला.तसेच सध्यस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसमोर स्वत:च्या आव्हानांचे एव्हरेस्ट आहे.परंतु, प्रत्येकाने स्वत:समोर एक लक्ष्य ठेवून लक्षपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,असेही सिन्हा यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा