शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

हे सरकार चालणार नाही तर पळणार..." पुण्यातील रिक्षाचालकांच्या मुख्यमंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:09 IST

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री झालेल्या शिंदेकडून रिक्षाचालकांच्या मागण्या

पुणे : एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी राजभवनात 30 वे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, सगळी कडे चर्चा होत आहे ती एक त्यांच्या साधा रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाच्या प्रवासाची. याआधीच्या महाविकास आघाडीवर टीका केली जायची की हे तीन चाकी सरकार आहे कसे चालणार ? पण आज एक रिक्षा चालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. तर हे सरकार चालणार नाही तर पळणार अशी भावना पुण्यातील रिक्षा चालक व्यक्त करीत आहेत. तसेच मुळ रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांच्याकडून हाेत आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः रिक्षा चालवली आहे तर त्यांना रिक्षाचालकांच्या अडचणी माहिती आहेत आणि आमच्या असणाऱ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत. याबाबत दैनिक लाेकमत ने काही रिक्षाचालकांशी संवाद साधला व त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी या अपेक्षा व्यक्त केल्या.

आम्हाला स्वतःच घर मिळावे

एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला आजही स्वतःचे घर नाही. 8 ते 10 लोक आम्ही भाड्याचे घरात राहतो. तर आमची त्यांना विनंती आहे की आम्हाला स्वतःच घर मिळावे. अशी एखादी योजना शासनाकडून आणावी त्याचे हप्ते आम्ही फेडू पण आम्हाला घर मिळावं. - राजेश कोंढे, सेवक वसाहत, पुणे विद्यापीठ

रिक्षाचालकास पेन्शन योजना चालू करावी

आम्ही तरुण आहोत तो पर्यंत आम्ही रिक्षा चालवणार आणि आमचा उदार निर्वाह भागवणार. पण उतार वयात काय? तर शासनाने उतार वयात रिक्षाचालकास पेन्शन योजना चालू करावी. - दिलीप तरपे, सांगवी

मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात

आम्ही रिक्षा चालवतो म्हणजे आम्ही समाज सेवा करत असतो तरी शिक्षण महाग झाले आहे. म्हणून मुलाचा शिक्षण खर्च आम्हाला खूप जड जातो. त्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात. - नागेश पाटील, दिघी

अनाधिकृत रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवले पाहिजे 

ओलामुळे आम्हाला रोजगार मिळतो पण आम्हाला पिक अप आणि वेटिंग चे पैसे मिळत नाहीत. सीएनजी आणि पेट्रोल चे भाव जास्त वाढल्यामुळे लोक थोड्या अंतरासाठी पायी जाणे पसंद करतात. कारण त्यांना रिक्षाचे भाडे परवडत नाही त्यामुळे इंधनाचे भाव कमी झाले पाहिजे. तसेच आज अनधिकृत रिक्षाचालक खूप झाले आहेत त्यांच्यावर पण नियंत्रण ठेवले पाहिजे. - विनोद वैरागर, औंध गाव

पत्नी मुलांना शासनात सवलत मिळावी

रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावेत , रिक्षाचालकासाठी मोफत आरोग्य योजना चालू कराव्यात, रिक्षा चालवताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा कुटुंबास पाच लाख रुपये मिळावेत व त्याच्या पत्नी मुलांना शासनात सवलत मिळावी. - गणेश बाबुराव ठोंबरे, पौड गाव

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीauto rickshawऑटो रिक्षा