शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

हे सरकार चालणार नाही तर पळणार..." पुण्यातील रिक्षाचालकांच्या मुख्यमंत्र्यांकडून वाढल्या अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:09 IST

रिक्षाचालक ते मुख्यमंत्री झालेल्या शिंदेकडून रिक्षाचालकांच्या मागण्या

पुणे : एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी राजभवनात 30 वे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, सगळी कडे चर्चा होत आहे ती एक त्यांच्या साधा रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाच्या प्रवासाची. याआधीच्या महाविकास आघाडीवर टीका केली जायची की हे तीन चाकी सरकार आहे कसे चालणार ? पण आज एक रिक्षा चालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. तर हे सरकार चालणार नाही तर पळणार अशी भावना पुण्यातील रिक्षा चालक व्यक्त करीत आहेत. तसेच मुळ रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांच्याकडून हाेत आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः रिक्षा चालवली आहे तर त्यांना रिक्षाचालकांच्या अडचणी माहिती आहेत आणि आमच्या असणाऱ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत. याबाबत दैनिक लाेकमत ने काही रिक्षाचालकांशी संवाद साधला व त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी या अपेक्षा व्यक्त केल्या.

आम्हाला स्वतःच घर मिळावे

एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आहे. पण आम्हाला आजही स्वतःचे घर नाही. 8 ते 10 लोक आम्ही भाड्याचे घरात राहतो. तर आमची त्यांना विनंती आहे की आम्हाला स्वतःच घर मिळावे. अशी एखादी योजना शासनाकडून आणावी त्याचे हप्ते आम्ही फेडू पण आम्हाला घर मिळावं. - राजेश कोंढे, सेवक वसाहत, पुणे विद्यापीठ

रिक्षाचालकास पेन्शन योजना चालू करावी

आम्ही तरुण आहोत तो पर्यंत आम्ही रिक्षा चालवणार आणि आमचा उदार निर्वाह भागवणार. पण उतार वयात काय? तर शासनाने उतार वयात रिक्षाचालकास पेन्शन योजना चालू करावी. - दिलीप तरपे, सांगवी

मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात

आम्ही रिक्षा चालवतो म्हणजे आम्ही समाज सेवा करत असतो तरी शिक्षण महाग झाले आहे. म्हणून मुलाचा शिक्षण खर्च आम्हाला खूप जड जातो. त्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात. - नागेश पाटील, दिघी

अनाधिकृत रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवले पाहिजे 

ओलामुळे आम्हाला रोजगार मिळतो पण आम्हाला पिक अप आणि वेटिंग चे पैसे मिळत नाहीत. सीएनजी आणि पेट्रोल चे भाव जास्त वाढल्यामुळे लोक थोड्या अंतरासाठी पायी जाणे पसंद करतात. कारण त्यांना रिक्षाचे भाडे परवडत नाही त्यामुळे इंधनाचे भाव कमी झाले पाहिजे. तसेच आज अनधिकृत रिक्षाचालक खूप झाले आहेत त्यांच्यावर पण नियंत्रण ठेवले पाहिजे. - विनोद वैरागर, औंध गाव

पत्नी मुलांना शासनात सवलत मिळावी

रिक्षाचे मुक्त परवाने बंद करावेत , रिक्षाचालकासाठी मोफत आरोग्य योजना चालू कराव्यात, रिक्षा चालवताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याचा कुटुंबास पाच लाख रुपये मिळावेत व त्याच्या पत्नी मुलांना शासनात सवलत मिळावी. - गणेश बाबुराव ठोंबरे, पौड गाव

टॅग्स :PuneपुणेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीauto rickshawऑटो रिक्षा