पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलतांना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात सध्या एशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरू असून तो 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील ऊर्जा गरजा भागवण्यात मोठी मदत होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात सध्या 5 लाख सौर पंपांची गरज आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी महत्त्वाच्या इमारतींनी सौरऊर्जेकडे वळले पाहिजे, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. हायड्रोजन क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी विशेष उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि या क्षेत्रात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. असे फडणवीस म्हणाले.
पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:14 IST