शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:14 IST

जालिंदर सुपेकरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,"ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल, पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलतांना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात सध्या एशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरू असून तो 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील ऊर्जा गरजा भागवण्यात मोठी मदत होणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात सध्या 5 लाख सौर पंपांची गरज आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी महत्त्वाच्या इमारतींनी सौरऊर्जेकडे वळले पाहिजे, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. हायड्रोजन क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी विशेष उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि या क्षेत्रात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. असे फडणवीस म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी जालिंदर सुपेकरांवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,"ज्या आरोपांमध्ये तथ्य असेल, पुरावे असतील, तिथं योग्य ती कारवाई केली जाईल. आम्ही कोणालाही वाचविणार नाही, पण बेबनाव आरोपांवर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.सामाजिक विभाग निधीबाबत स्पष्टीकरणसामाजिक विभागाच्या निधीविषयी आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आपल्या बजेटच्या नियमानुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी असलेल्या योजना त्या विभागाच्या हेडखालीच टाकाव्या लागतात. त्यामुळे इतर कुठल्या विभागाकडून पैसे वळवलेले नाहीत. अजितदादांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले आहे की यावेळी अधिक तरतूद करण्यात आली आहे आणि ही तरतूद पूर्वीपेक्षा जास्त आहे. पैसा कुठेही वळवलेला नाही; त्याच विभागांमध्ये योग्य प्रकारे खर्च करण्यात आला आहे, असंही त्यांनी नमूद केलं.सामना केल्या जाणाऱ्या टीकेबाबत फडणवीसांचा रोखठोक सवाल‘सामना’ या वृत्तपत्रावर टीका करत फडणवीस म्हणाले, सामना कोणती सर्टिफिकेट देणारी संस्था आहे का? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सामना होता. असं म्हणत टीका केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस