शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

.....अशी माणसे असतील तर बदल होणारचं असा विश्वास वाटतो:  डॉ. बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 19:57 IST

नाटक संपल्यानंतर देखील निळूभाऊ आणि डॉक्टर हातात झोळी आणि पंचा घेऊन लोकांसमोर उभे राहिले....

ठळक मुद्देडॉ. श्रीराम लागू किंवा निळू फुले यांच्यासारखी माणसे जाण्यामुळे पोकळी ही जाणवत राहणार

पुणे: डॉ. श्रीराम लागू हे सामाजिक कृतज्ञता निधीचे संस्थापक अध्यक्ष होते. हा निधी १९८९ पासून सुरू झाला. राज्यात लग्नाच्या बेडी नाटकाचे ५० प्रयोग करून डॉ. लागू, निळू फुले, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी यांनी 25 लाख रूपयांचा निधी जमविला. समाजात जी काम करणारी मुले आहेत. जी कोणत्याही राजकीय पक्षांशी निगडित नाहीत, अशा कार्यकर्त्यांना मानधन दिले जावे यासाठी ही निधीची योजना होती. डॉ. लागू यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी ती उचलून धरली. नाटकातल्या भूमिका जशा त्यांनी मन लावून केल्या तशा सार्वजनिक जीवनातील जबाबदारी देखील त्यांनी तितक्याच समरसतेने उचलली. नाटक संपल्यानंतर देखील निळूभाऊ आणि डॉक्टर हातात झोळी आणि पंचा घेऊन लोकांसमोर उभे राहिले.  त्यावेळी हजारो रुपये जमले. एखाद्या कामात समर्पित होऊन काम करण्याची त्यांच्यात वृत्ती होती. दोघांवरही सेवादलाचे संस्कार होते. डॉ. लागू यांच्या सामाजिक कार्याचे आणखी एक मोठेपण म्हणजे त्यांनी केलेला सत्याग्रह. शनी शिंगणापूरला महिलांना प्रवेश नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सत्याग्रह करण्याचे ठरविले. त्यामध्ये डॉ. लागू यांनी पुढाकार घेतला. डॉ. एन.डी पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. लागू, निळू फुले सर्वजण नगरला जमले आणि तिथून सत्याग्रहाची तुकडी निघाली. तेव्हा पोलिसांनी लगेच अटक केली. तिथल्या पोलीस कोठडीत आम्हाला ठेवण्यात आले. दुस-या दिवशी आम्हाला न्यायालयात हजर करणार होते. डॉ. लागू तयारीनीशी आले होते. न्यायालयात ते बसून होते. डॉ. लागू यांनी सत्याग्रह करणं ही आमच्यासाठी आश्चर्यकारक होते. लोक सहानुभूती दाखवतात. मायेचा हात फिरवतात. परंतु प्रत्यक्षात कृतीमध्ये सहभागी होणं. शांततामयी सत्याग्रहात भाग घेणं हे तितक सोपं नाही. आज त्यांची आठवण होते की शबरीमाला प्रकरणाचे अजून काही झाले नाही. डॉ. लागू यांच्यासारखी समाजधुरिणी, कलावंत मंडळी जेव्हा भाग घेतात तेव्हा प्रश्न सुटायला मदत होते. आणीबाणी विरोधात ही कलावंत मंडळी उभी राहिली होती. या माणसांसारखी माणसं जेव्हा कामाला पाठिंबा देतात. तेव्हा विश्वास वाटतो की बदल होणारचं. डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. श्रीराम लागू किंवा निळू फुले यांच्यासारखी माणसे जाण्यामुळे पोकळी ही जाणवत राहाणार. राजकीय पद मिळविण्यापेक्षा सामाजिक बदलांसाठी काम करणं अधिक महत्वाचं आहे. ------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावShriram Lagooश्रीराम लागूNilu Phuleनिळू फुले