शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

व्यवस्थेला प्रश्न केले नाहीत तर तयार हाेतात अंधभक्ताच्या फाैजा; अमोल कोल्हेंचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 15:08 IST

शिवचरित्रातून समाजमनाची बांधणी व्यवस्थित झाली तर त्यावर कुठल्याही आघाताचा काहीही परिणाम हाेणार नाही

पुणे : इतिहासाकडे चिकित्सक वृत्तीने बघण्याची सवय लावून घ्यावी. विचारधारेला प्रश्न विचारले नाहीत तर मेंढराचे कळप तयार हाेतात आणि व्यवस्थेला प्रश्न विचारले नाहीत तर अंधभक्ताच्या फाैजा तयार हाेतात. त्यामुळे इतिहासाची डाेळसपणे चिकित्सा झाली पाहिजे. शिवछत्रपतींवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट, मालिका तयार केली पाहिजे, असे मत अभिनेते खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी व्यक्त केले.

कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या महासम्राट या कादंबरी मालिकेच्या ‘रणखैंदळ’ या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन डाॅ. काेल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी मेहता पब्लिशिंग हाउसचे अखिल मेहता उपस्थित हाेते.

डाॅ. काेल्हे म्हणाले, ‘कादंबरी, नाटकं, महानाट्य, मालिका, चित्रपट यातून इतिहास आपल्यासमोर यायला हवा. शिवचरित्र हे केवळ सात घटनांपुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती खूप माेठी आहे. शिवचरित्रातून समाजमनाची बांधणी व्यवस्थित झाली तर त्यावर कुठल्याही आघाताचा काहीही परिणाम हाेणार नाही. इतिहासामुळे आत्मभान येते, तसेच आपला स्वाभिमान जागृत हाेताे आणि त्यातून राष्ट्राची निर्मित्ती हाेत असते.’

पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या ध्यासाचा, अभ्यासाचा आणि काळजाचा विषय आहे. त्यामुळे ही कादंबरी लिहीत आहे. मला संशाेधन मांडायचे हाेते; पण जनसामान्यांसाठी कादंबरी लिहित आहे. माझी ही कादंबरी आचार्य अत्रे यांना अर्पण करीत आहे. कर्नाटकात शहाजी महाराजांची विदीर्ण अवस्थेतील समाधी पाहून महाराष्ट्रात भूकंप हाेईल, असे वाटले हाेते. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली. नेताजी पालकर यांच्यावर महानाट्य लिहून तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPoliticsराजकारण