शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...

By हेमंत बावकर | Updated: July 28, 2025 11:07 IST

Hinjawadi IT Park Traffic, Companies: हिंजवडी एकटी बुडणार नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांना सोबत घेऊन बुडणार आहे हे नक्की...

- हेमंत बावकर

राज्यात सध्या हिंजवडीच्या वाट्टोळे झाल्यावरून जोरदार खळबळ उडाली आहे. तत्कालीन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडपासून हाकेच्या अंतरावरील हिंजवडी गावात आयटी पार्क उभारण्याच्या कामी मोठी शक्ती खर्च केली होती. इन्फोसिस, टेक महिंद्रासारख्या मोठमोठ्या कंपन्या तिथे वसल्या होत्या. हिंजवडीला जाणारे रस्ते तेव्हा पुरेसे होते, कारण तेव्हा वाहने जास्त नव्हती. अधिकतर मोटरसायकलीच आणि टेक कंपनीत मोठ्या पदावर असलेल्यांचाच तेवढ्या कार असा गोतावळा हिंजवडीकडे ये-जा करत होते. परंतू, गेल्या ५-६ वर्षांत हिंजवडीच्या आयटीपार्कमध्ये फोर व्हीलरची ये-जा वाढली ती कोरोनामुळे आणि सुरु झाली ती प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या. 

आज आयटीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक जोडप्याकडे दोन चारचाकी आहेतच आहेत. एकच असेल तरी ती छोटी नाही तर एसयुव्हीच. यामुळे हिंजवडीकडे जाणारे रस्ते अपुरे पडू लागले. एका कारमध्ये एकच जण. पाऊस, थंडी, उन असले की बघायलाच नको. रस्ते तुडुंब वाहनांनी भरलेले असतात. वाकड, पुनावळे, ताथवडे, बावधन, कोथरुड आणि पुणे-पिंपरी चिंचवडच्या इतर भागातून आयटी पार्कमध्ये नोकरी करणाऱ्यांनी घरे घेतली. पार अगदी आळंदी मोशीपर्यंत हे लोक राहत आहेत. अनेकांनी मगरपट्टा, खराडी आयटी पार्क आणि हिंजवडी सेंटर पडेल असा औंध, बाणेर, बोपोडी, खडकी भाग निवडला आणि मग सुरु झाली ती त्यांची आणि त्यांच्या कंपन्यांची कोंडी. 

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीच्या सरपंचाला वाट्टोळे केले असे चारचौघात म्हटले आणि पुन्हा हिंजवडीची चर्चा सुरु झाली. काल वृत्त आले की हिंजवडीतून ३७ कंपन्यांनी स्थलांतर केले. हे ऐकायला, वाचायला एवढेही सोपे नाही. ३७ कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करत होते. त्यांना हजारो लोक सेवा पुरवत होते. याच कँटीन, सफाई, इलेक्ट्रीशिअन, या सर्वांना वस्तू पुरविणारे आहेत. हे हजारो कर्मचारी त्यांचा लाखांमध्ये मिळणारा पगार बँकांचे ईएमआय, घरांचे भाडे, दुकाने, मॉल, दूध, भाजीपाला यासाठी खर्च करत होते. ते गेले. कुठे हैदराबाद, बंगळुरुला. म्हणजेच राज्याचा जीएसटी स्वरुपातील मोठा महसूल गेला. पुण्याचा महसुल गेला. त्याहून जास्त तोटा म्हणजे घरभाडे, दूध, भाजीपाला पुरविणाऱ्यांचा पैसा गेला.

अजित पवार उगाच म्हणाले नाहीत, वाट्टोळे झाले म्हणून. काकांनी आपल्या काळात उभारलेली महाराष्ट्राची ही संपत्ती पुतण्याच्या काळात जाताना त्याना पहावे लागत आहे. हिंजवडी आयटी पार्क जर हातचा गेला तर सर्वाधिक नुकसान पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड गेल्या १०-१५ वर्षांत भरमसाठ वाढले आहे. २००९ मध्ये पुण्यातील रस्ते रिकामे असायचे. हिंजवडीतीलही रस्ते रिकामे असायचे. तुम्ही स्कुटरने जा की कारने तुम्हाला कुठेही अडकावे लागत नव्हते. परंतू, या काळात हिंजवडीच्या आजुबाजुला पुणे पिंपरी चिंचवडच्या आजुबाजुला एवढ्या इमारती वाढल्या की आज तिथून वाट काढणेदेखील मुश्कील बनलेले आहेत. पूर्वी या भागात शेती होती. पूर्ण शेती. ती आता बिल्डरांना विकून, विकसित करून त्याजागी मोठमोठ्या सोसायट्या उभ्या ठाकल्या आहेत. ८-१० लाखांना मिळणारे फ्लॅट आता ७०-८० लाखांपासून पुढे १,२,३ कोटींवर कधी गेले समजलेच नाही. 

सर्वात मोठा फटका कुणाला...

हिंजवडी आयटी पार्क गेल्याचा सर्वात मोठा फटका या आयटी कर्मचाऱ्यांनाच बसणार आहे. कारण त्यांनी लाखोंमध्ये पॅकेजेस असल्याने कोटींमध्ये किंमती असलेली घरे घेतलेली आहेत. पार्क गेला की या भागातील घरांची मागणी कमी होणार, मागणी कमी झाली की पर्यायाने रिअल इस्टेटचे दर कोसळणार. कर्मचारी कंपनी गेल्याने एकतर दुसरीकडे नोकरी शोधतील किंवा ते देखील बंगळुरू, हैदराबादची वाट धरतील. म्हणजेच हे घर रिकामे होईल किंवा भाडेकरूही मिळणार नाही. ज्यांनी भाड्याने घरे दिलीत ती देखील रिकामी राहतील. अशावेळी त्यांना करोडोत घेतलेले घर कमी किंमतीत विकावे लागणार किंवा बाजारात प्रॉपर्टीच्या किंमती कमी झालेल्या असताना आधी जास्त किंमतीने घर घेतलेले असल्याने त्याचे ईएमआय भरावे लागणार आहेत. हिंजवडी आयटी पार्क गेल्याची सर्वात मोठी किंमत या तरुण पिढीला मोजावी लागणार आहे. महापालिका त्यांचा कर लादतच राहणार, वसुलही करत राहणार आहेत. सरकारला जीएसटीच्या स्वरुपात त्या घरांचा पैसाही मिळाला आहे. राजकारण्यांनी आपले पैसे कमावून घेतले आहेत. पण ज्यांनी घरासाठी पैसे गुंतविले आहेत त्यांचा पैसा बुडणार आहे. तेथील लोकांचे उत्पन्न बुडणार आहे. हिंजवडी एकटी बुडणार नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांना सोबत घेऊन बुडणार आहे हे नक्की. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीTrafficवाहतूक कोंडीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडITमाहिती तंत्रज्ञान