शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कोथरूडच्या सांस्कृतिक राजधानी असली तरी कागदपत्रे कसब्यात : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 09:05 IST

सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरुडमधून प्रतिनिधीत्व करत आहेत. अशावेळी बापट यांचे हे वक्तव्य जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरले हे मात्र निश्चित. 

पुणे :कोथरूड पुण्याची सांस्कृतिक राजधानी असली तरी तिची कागदपत्रे शनिवार वाडा आणि कसब्यात आहेत अशा शब्दात खासदार गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा 'कसब्याचे' महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष कोथरुडमधून प्रतिनिधीत्व करत आहेत. अशावेळी बापट यांचे हे वक्तव्य जाणकारांच्या भुवया उंचावणारे ठरले हे मात्र निश्चित. 

पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, शिवसेनेचे शशिकांत सुतार, काँग्रेसचे रमेश बागवे, मनसेचे किशोर शिंदे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना बापट म्हणाले की, 'सर्वपक्षीयांनी एकत्रित काम करून जनतेचे प्रश्न सोडवायला हवेत. काम झाल्यावर त्याचा फायदा कोणत्याही पक्षाला नाही तर जनतेला होत असतो. पुण्यात भेडसावणाऱ्या पाण्याच्या, वाहतुकीच्या प्रश्नांवर मोहोळ काम करतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुणे शहराबद्दल वेगळे आगळे आकर्षण आहे. कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी आहे. मात्र, राजधानी असली तरी तिची कागदपत्रे मात्र शनिवारवाडा आणि कसब्यात आहेत'असेही ते म्हणाले. 

  चंद्रकांत पाटील म्हणाले की,  'आगामी काळात निवडणुका जिंकता येणार नाहीत, इव्हेन्ट मॅनेजमेंटवर नेता होता येणार नाही आणि राज्यही चालवता येणार नाही. प्रत्यक्ष सामान्य माणसाला विश्वास वाटला तर निवडून येता येईल. असा विश्वास फडणवीस यांच्या बद्दल जनतेला वाटला आणि त्यामुळे वसंतराव नाईकांप्रमाणे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले. शेवटच्या दिवशी  पैसे वाटून काही होणार नाही असेही ते म्हणाले.   

टॅग्स :girish bapatगिरीष बापटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाkothrudकोथरूडkasba-peth-acकसबा पेठ