शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

महापुरुषांचे विचार नव्या पिढीला दिशा देणारे - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 3:54 AM

महापुरुषांचे विचार नवीन पिढीला दिशा देणारे असून या मौल्यवान विचारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. या विचारांचा यज्ञ भोर मधून सुरु झाला

नेरे (जि. पुणे) : महापुरुषांचे विचार नवीन पिढीला दिशा देणारे असून या मौल्यवान विचारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. या विचारांचा यज्ञ भोर मधून सुरु झाला असून यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.येथील तिसरे फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या दुसºयाा सत्राचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी जेष्ठ सिने दिग्दर्शक जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख डॉ. विजय खरे, माजी मंत्री अनंतराव थोपटे, जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रोहिदास जाधव उपस्थित होते.शिंदे म्हणाले, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांनी समाजाला जगण्याची दिशा दिली. हे विचार सर्वांनी आत्मसात करावे. आजच्या काळात हे विचार जपण्याची नितांत आवश्यकता आहे. जब्बार पटेल म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपण सर्व बांधले गेलो आहोत. मानवताधर्म शिकवणारी भारतीय राज्य घटना ही एक चुंबकिय शक्ती आहे. भावनेपेक्षा वैचारिक भूमिकेतून भारतीय राज्यघटनेकडे पाहिले गेले पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्य गौरव पुरस्काराने साहित्यिक चंद्रकांत सकपाळ यांना गौरवण्यात आले. स्काऊट गाईडचा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कु. अंजली सोमनाथ कुंभार हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘सूर्य फुले’ या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.