शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 14:58 IST

पुण्यात जवळपास 15 गाड्यांना अजूनही आयसीएफ'डबे, अपघात झाल्यास जीवितहानी जास्त होणार

प्रसाद कानडे 

पुणे : भारतीय रेल्वे बुलेट ट्रेनच्या दिशेने प्रवास करीत असली तरीही अजूनही बहुतांश रेल्वे गाड्यांना 60 वर्ष जून्या तंत्रज्ञानवर आधारित तयार केलेले ' आयसीएफ' दर्जाचे डबे वापरले जात आहे. ज्या ज्या वेळी आयसीएफ चे डबे असलेल्या रेल्वेचा अपघात झाला आहे. हे डबे नव्या 'एलएचबी' डब्यांच्या तुलनेत खूप मागास व अधिक धोकादायक ठरले आहे. रेल्वेने देखील हे मान्य केले आहे. ज्या वेळी 'आयसीएफ 'डबे जोडलेल्या रेल्वेचा अपघात झाला आहे.त्यावेळी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. 

तीन दिवसापूर्वी बिकानेर -गोवाहाटी एक्सप्रेसचा अपघात झाला. 9 प्रवासी मृत्युमुखी पडले तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले. या गाडीला देखील आयसीएफ चे डबे जोडण्यात आले होते. त्यामुळे जखमी व मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. जर इथे एलएचबी दर्जाचे डबे असते. तर कदाचित चित्र वेगळे असते.

स्वीझरलँडकडून 1955 साली घेतलेले तंत्रज्ञान 

स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वे डबे लाकडाचे होते. स्वतंत्र नंतर मात्र रेल्वेने कूस बदलली. 1955 साली भारतीय रेल्वेने स्विझरलॅन्ड हुन आताच्या ' आयसीएफ' डब्याचे शेल आणले. त्यानंतर त्याचा आधार घेऊन चेन्नईच्या इन्ट्रीग्रल कोच फॅक्टरी 1962 साली पहिला डबा तयार झाला. त्यालाच आयसीएफ डबा असे नावं देण्यात आले. वेळोवेळी गरजेनुसार त्यात बदल होत गेले. मात्र ते खूप छोट्या स्तरावरचे होते. यातले मुख्य तंत्रज्ञान अजून ही 1962 सालचेच आहे. तीन वर्षांपूर्वी ह्या डब्यांचे उत्पादन बंद करण्यात आलं आहे. मात्र अजूनही देशातल्या 50 टक्के हुन अधिक गाड्यांना हेच डबे वापरले जात आहे.

पुण्यातून सुटणाऱ्या 15 गाड्यांना आयसीएफ चे डबे पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या जवळपास 15 गाड्यांना अजूनही धोकादायक समजले जाणारे आयसीएफ चे डबे जोडले आहेत. यात पुणे - जम्मूतवी झेलम एक्सप्रेस, पुणे - पटना एक्सप्रेस, पुणे - हावडा एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस,कोयना एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे - दरभंगा एक्सप्रेस, पुणे -वाराणसी, महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे - एरणाकुलम एक्सप्रेस, पुणे- वेरावल,जोधपूर, आदी गाड्यांचा समावेश आहे. 

आयसीएफ डबे नुकसान दायक कसे 1. हे डब्यांचे वजन खूप असते,त्यामुळे याच्या गतीवर देखिल परिणाम होतो.2. डबे एकमेकांना जोडण्यासाठी स्क्रु कपलिंग चा वापर होतो.त्यामुळे अपघात झाल्यावर डबे एकमेकांवर चढतात तसेच ते लांब पर्यत फेकले जातात. यातच  जीवितहानी जास्त होते. 

''आम्ही आयसीएफ डब्यांच्या बदल्यात नवे एलएचबी डबे जोडण्याचे काम करीत आहोत. आता पर्यंत अनेक गाड्यांना जोडून देखील झाले आहे. मात्र ह्याला आणखी किती वेळ लागेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही असे राजीव जैन (अतिरिक्त महासंचालक, प्रसिद्धी विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली) यांनी सांगितले.'' 

''रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार तीन वर्षापासून ह्या डब्यांचे उत्पादन बंद झाले आहे. 1962 पासून हे डबे तयार केले जात आहे. गरजेनुसार त्यात  वेळोवेळी काही प्रमाणात  बदल झाला आहे असे जी व्यंकटेशन (जनसंपर्क अधिकारी, आयसीएफ, चेन्नई) यांनी सांगितले.'' 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीMONEYपैसाGovernmentसरकार