शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

९१ वर्षांचा झालो म्हणून गप्प बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:09 IST

लक्ष्मण मोरे पुणे : “मी ९१ वर्षांचा झालो म्हणून गप्प बसणार नाही आणि तरुणांना गप्प बसू देणार नाही. तरुणांचे ...

लक्ष्मण मोरे

पुणे : “मी ९१ वर्षांचा झालो म्हणून गप्प बसणार नाही आणि तरुणांना गप्प बसू देणार नाही. तरुणांचे भविष्य सद्यःस्थितीत स्पष्ट दिसत नाही. देशातील राजकारण्यांकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही. तरुणांना प्रशिक्षित आणि प्रेरित करण्याची मोहीम हाती घेणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केले.

डॉ. आढाव यांनी मंगळवारी (दि. १) नव्वदी ओलांडून ९१ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. “कोरोनाने रोजच्या जगण्यातले प्रश्न दुय्यम बनवले आहेत. तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. देशात तरुणांची संख्या मोठी असताना त्यांना त्यांचे भविष्य स्पष्ट दिसत नाही. जे शिकले आहेत ते परदेशात जायचा विचार करताहेत,” अशी चिंता या वेळी बाबांनी व्यक्त केली.

“कोरोनाच्या संकटाने भारताला सावध केले आहे. अशी संकटे आता वारंवार येणार हे लक्षात घेऊन प्रशिक्षित तरुणांची फळी उभी करावी लागेल,” असे बाबा म्हणाले. राजकारण्यांकडून फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत. काँग्रेसपासून सर्वच राजकीय पक्ष मूल्ये आणि संकल्प विसरले आहेत. तरुणच या देशात बदल घडवू शकतील, असे म्हणत त्यांनी तरुणाईला साद घातली. जातीय, धर्मीय, प्रांतीय आणि भाषीय भेदाभेद या काळातही अदृश रूपाने सुरू असून हा ढोंगीपणा असल्याची टीका त्यांनी केली.

चौकट

‘मन की बात’ करणाऱ्यांनी ‘जन की बात’ ऐकावी

“अनेकांना रोजगार नाही. त्यांचे जीवनमान ढासळते आहे. आपल्याकडील लोकांची समज कमी पडते आहे. भारतात भांबावलेपण आहे. या काळात निर्धाराने पुढे जायला पाहिजे. पण, तो निर्धार राजकारणात दिसत नाही. शासन आर्थिक धोरणाचा फेरविचार करायला तयार नाही. आत्मप्रौढीत सर्व मग्न आहेत. एकमेकांच्या उरावर बसण्याची स्पर्धा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जे झाले त्याबद्दल देशाची क्षमा मागायला हवी,” असे डॉ. बाबा आढाव म्हणाले.

चौकट

मानपानाची अपेक्षा नाही, पण दोन शब्द ऐकाल की नाही?

“आमच्यासारख्यांनी स्वातंत्र्ययुद्ध पाहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तिसंग्राम जवळून पहिला. दोन महायुद्धे आणि मोठमोठी जनआंदोलने पाहिली. आजची स्थिती पाहिल्यावर देशाच्या भवितव्याची काळजी वाटायला लागते. भारतासारख्या मोठ्या देशाला ‘ऑक्सिजन’साठी जगाकडे धावा करायला लागतो हे लाजिरवाणे आहे. मनुष्यत्वाला लाज वाटेल अशी स्थिती देशात आहे. आम्हाला मोठेपणा, मानपान नको आहे. पण अनुभवाचे बोल ऐकायचीही तयारी नाही. आमच्यासारख्यांची खिल्ली उडवली जाते याचे वाईट वाटते,” अशी खंत डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.

चौकट

वाटले गेलेले ‘राष्ट्रपुरुष’ आणि शिक्षक

“प्रत्येक समाजसमूहाने आपापले राष्ट्रपुरुष वाटून घेतले आहेत. संविधानाला जर आपण आपले मानले आहे, तर मग संविधानाशी इमान जाहीर करा. देशात मनामनात संविधान एके संविधान रुजवून वाटचाल करावी लागणार आहे,” असे बाबांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी स्वस्थ बसू नये. पिढी घडविण्याची त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. शिक्षकांनी जबाबदारी घेऊन मुलांना स्वच्छता राखण्याबाबत प्रशिक्षित करणे आवश्यक आहे.

चौकट

‘लोकमत’कडून अपेक्षा

“सध्याचा काळ बिकट आहे. माध्यमांची जबाबदारी वाढली आहे. रोजचे प्रश्न आणि समाजातील भयाण वास्तव समोर आणायला हवे. तरच व्यवस्था सुधारेल. लोकांचा अजूनही माध्यमांवर विश्वास आहे. तो जपला पाहिजे. ही जबाबदारी ‘लोकमत’ने उचलावी,” अशी अपेक्षा बाबांनी व्यक्त केली.