शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 00:36 IST

...यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभारता सर्वच राजकीय पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मात्र सर्वांचे लक्ष आहे ते बारामतीकडे. आज बारामती जिल्ह्यातील शिर्सुफळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रचारसभेत राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबरदस्त बॅटिंग केली. यावेळी, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा वजा सूचना देत, धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा संपूर्ण किस्सा जसाच्या तसा सांगितला. तसेच, जनतेला भावनिक न होण्याचे आवाहनही केले.  

आपला धरणासंदर्भातील 'तो' किस्सा सांगताना अजित दादा म्हणाले, "मी असंच त्या निंबोडीमध्ये एका बैठकीत, कॅमेरा नव्हता काही नव्हतं, सहज आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय आता तिथं काय करावं का? धरणात... माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो, नसो, सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं... नीट बोलायचं... नीट बोलायचं... शब्द कुठला चुकीचा जाऊ द्यायचा नाही... जाऊ द्यायचा नाही... जाऊ द्यायचा नाही... मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही... द्यायचा नाही... द्यायचा नाही..."

पुढे बोलताना अजित दादा म्हणाले, "माणूस चुकतो ना, अरे जो काम करतो तोच चुकतो. जो बोलतो... मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला. परंतु कायम गेला नही. त्याकरता माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, आत्ता साहेब उभे नाहीत, मीही उभा नाही. आम्ही दोघेही नाही. त्यामुळे आता तुमच्या घरात 40 वर्षांपूर्वी आलेल्या सूनेला निवडून द्यायचं की, मुलीला द्यायचं, हे ठरवा तुम्ही. त्यामध्ये सुनेला मान असतो. सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो तुमच्या आमच्या घरात सून आली की, थोड्या दिवसाने सासू तिच्याच हातात चाव्या देते ना. सर्व तू आता बघ, चूकलं तर ती सुनेला सांगते, हे चूकलंय, हे दुरुस्त कर. आईच्या पोटातून तर कुणीच शिकून येत नाही. मीही नाही आलो. मी 1984 ला भाषणं करायचो, पाय लटलट कापायचे. कुणी तरी सांगायचं तिकडे बघून भाषण कर.. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे भावनिक होऊ नका." 

एकाचं कुंकू लावा... माझं तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा... -"काही जण दादा आले की, दादांच्या पुढे पण, हालगी वाजत असती, फटाके वाजत असतात. माझ्याही पुढे चालतात दादांना दिसावे, असे चालतात. दादांची पाठ फीरली आणि आमचे दुसरे आले की, त्यांच्यासोबत. अरे काय चाललंय तुमचं. एकाचं कुंकू लावा. माझं तरी लावा नाही तर त्यांचं तरी लावा. हा काय लावला चाहाटळपणा, हे झाकून राहत नाही," असा इशारा देत दादांनी धरणाचा किस्सा सांगितला.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ -"आज परिस्थिती बदलली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार. जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही. अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते. त्या साठी महायुतीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा, असे पवार म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ajit Pawarअजित पवारElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४