शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:08 IST

लक्ष्मण माने यांनी बंचित बहुजन आघाडीतून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमाेर आपली भूमिका स्पष्ट केली.

पुणे : पक्षाच्या संस्थापक सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. तसेच पक्षात आरएसएसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामाकाजात हाेत असल्याचे निष्पन्न हाेत असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी केला. पक्षात घुसमट हाेत असल्याने मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील माने यांनी पुण्यात माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. 

संभाजी भिडे यांचे धारकरी असलेल्या तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेचे तिकीट दिले. आता तर पक्षाचे महासचिव पद व पक्ष प्रवक्ते पद पडळकर यांना देण्यात आले. तसेच डाॅ. ए. आर. अंजारिया हे आर.एस.एसचे मुस्लिम समाजातील हस्तक व भाजपाचे मुस्लिम आघाडीचे नेते यांना पक्ष संघटनेच्या कार्यकारणीत घेतले. यावरुन आर.एस.एसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामकाजात झाल्याचे निष्पन्न हाेत आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माने यांनी केली. तसेच आपण पक्षाच्या सदसत्वाचा आणि पार्लमेंट्री बाेर्डाच्या सदसत्वाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

माने म्हणाले, आरएसएसचा प्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षामध्ये दिसून येत आहे. आरएसएसमध्ये वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेची उमेदवारी देण्यात आली तसेच त्यांना पक्षाचे महासचिव पद देखील देण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यशैलीबाबत माझे मतभेद आहेत. आंबेडकरांसारखी माझी कार्यपद्धती नाही. माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे.  प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वाईट बाेलणार नाही. परंतु आम्ही एकत्र काम करणं शक्य नाही. लाेकसभेचे सर्व उमेदवार आंबेडकरांनी स्वतःच निवडले. लाेकसभेला आमचे निर्णय चुकले. काॅंग्रेससाेबत आघाडी केली असती तर आमच्या तीन ते चार जागा आल्या असत्या. परंतु लाेकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी आंबेडकरांवर टाकत नाही. ती आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यावेळी मला काही बाेलता आले नाही कारण मी पक्षाच्या चाैकटीत हाेताे. आता मी हे सांगताेय कारण मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 

मी आता पक्षातून बाहेर पडलाेय. त्यामुळे मी स्वतंत्र वाट निवडणार. भाजप शिवसेनेला मदत हाेईल असे काही करणार नाही. आम्हा वंचितांना सत्तेत जायचे आहे. आंबेडकरांकडे जाऊन देखील सत्तेत जाणार नसू तर आम्ही आमची स्वतंत्र वाट निवडू. यासाठी विधानसभेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करु तसेच आरपीआयच्या विविध गटांशी देखील चर्चा करु. प्रकाश आंबेडकरांना 248 जागा लढवायच्या असतील तर मी त्यांच्या साेबत जाणार नाही. मी राजकारण लेफ्ट टू दी सेंटर करताे. काॅंग्रेसला 44 जागांची ऑफर देणं हे काॅंग्रेसचा अपमान करणारं आहे. काॅंग्रेसशी मैत्री करायची असेल तर अशी भाषा याेग्य नाही. त्यामुळे आंबेडकरांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्या साेबत राहीन असे माने यांनी सांगितले.एमआयएमचा उपयाेग झाला नाही. लाेकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा उपयाेग झाला नाही असे माने यांनी सांगितले. त्यांचा उपयाेग झाला असता तर साेलापूरातून प्रकाश आंबेडकर निवडूण आले असते. परंतु तसे झाले नाही. असे माने यांनी सांगितले.

...तर प्रकाश आंबेडकरांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेनप्रकाश आंबेडकर यांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेन परंतु त्यांनी तत्त्वाशी तडजाेड करायला नकाे. त्यांनी आघाडीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्यासाेबत राहीन. अशी भूमिका माने यांनी घेतली. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण