शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:08 IST

लक्ष्मण माने यांनी बंचित बहुजन आघाडीतून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमाेर आपली भूमिका स्पष्ट केली.

पुणे : पक्षाच्या संस्थापक सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. तसेच पक्षात आरएसएसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामाकाजात हाेत असल्याचे निष्पन्न हाेत असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी केला. पक्षात घुसमट हाेत असल्याने मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील माने यांनी पुण्यात माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. 

संभाजी भिडे यांचे धारकरी असलेल्या तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेचे तिकीट दिले. आता तर पक्षाचे महासचिव पद व पक्ष प्रवक्ते पद पडळकर यांना देण्यात आले. तसेच डाॅ. ए. आर. अंजारिया हे आर.एस.एसचे मुस्लिम समाजातील हस्तक व भाजपाचे मुस्लिम आघाडीचे नेते यांना पक्ष संघटनेच्या कार्यकारणीत घेतले. यावरुन आर.एस.एसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामकाजात झाल्याचे निष्पन्न हाेत आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माने यांनी केली. तसेच आपण पक्षाच्या सदसत्वाचा आणि पार्लमेंट्री बाेर्डाच्या सदसत्वाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

माने म्हणाले, आरएसएसचा प्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षामध्ये दिसून येत आहे. आरएसएसमध्ये वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेची उमेदवारी देण्यात आली तसेच त्यांना पक्षाचे महासचिव पद देखील देण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यशैलीबाबत माझे मतभेद आहेत. आंबेडकरांसारखी माझी कार्यपद्धती नाही. माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे.  प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वाईट बाेलणार नाही. परंतु आम्ही एकत्र काम करणं शक्य नाही. लाेकसभेचे सर्व उमेदवार आंबेडकरांनी स्वतःच निवडले. लाेकसभेला आमचे निर्णय चुकले. काॅंग्रेससाेबत आघाडी केली असती तर आमच्या तीन ते चार जागा आल्या असत्या. परंतु लाेकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी आंबेडकरांवर टाकत नाही. ती आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यावेळी मला काही बाेलता आले नाही कारण मी पक्षाच्या चाैकटीत हाेताे. आता मी हे सांगताेय कारण मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 

मी आता पक्षातून बाहेर पडलाेय. त्यामुळे मी स्वतंत्र वाट निवडणार. भाजप शिवसेनेला मदत हाेईल असे काही करणार नाही. आम्हा वंचितांना सत्तेत जायचे आहे. आंबेडकरांकडे जाऊन देखील सत्तेत जाणार नसू तर आम्ही आमची स्वतंत्र वाट निवडू. यासाठी विधानसभेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करु तसेच आरपीआयच्या विविध गटांशी देखील चर्चा करु. प्रकाश आंबेडकरांना 248 जागा लढवायच्या असतील तर मी त्यांच्या साेबत जाणार नाही. मी राजकारण लेफ्ट टू दी सेंटर करताे. काॅंग्रेसला 44 जागांची ऑफर देणं हे काॅंग्रेसचा अपमान करणारं आहे. काॅंग्रेसशी मैत्री करायची असेल तर अशी भाषा याेग्य नाही. त्यामुळे आंबेडकरांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्या साेबत राहीन असे माने यांनी सांगितले.एमआयएमचा उपयाेग झाला नाही. लाेकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा उपयाेग झाला नाही असे माने यांनी सांगितले. त्यांचा उपयाेग झाला असता तर साेलापूरातून प्रकाश आंबेडकर निवडूण आले असते. परंतु तसे झाले नाही. असे माने यांनी सांगितले.

...तर प्रकाश आंबेडकरांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेनप्रकाश आंबेडकर यांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेन परंतु त्यांनी तत्त्वाशी तडजाेड करायला नकाे. त्यांनी आघाडीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्यासाेबत राहीन. अशी भूमिका माने यांनी घेतली. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण