शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:08 IST

लक्ष्मण माने यांनी बंचित बहुजन आघाडीतून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमाेर आपली भूमिका स्पष्ट केली.

पुणे : पक्षाच्या संस्थापक सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार सुरु आहे. तसेच पक्षात आरएसएसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामाकाजात हाेत असल्याचे निष्पन्न हाेत असल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी केला. पक्षात घुसमट हाेत असल्याने मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील माने यांनी पुण्यात माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. 

संभाजी भिडे यांचे धारकरी असलेल्या तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेचे तिकीट दिले. आता तर पक्षाचे महासचिव पद व पक्ष प्रवक्ते पद पडळकर यांना देण्यात आले. तसेच डाॅ. ए. आर. अंजारिया हे आर.एस.एसचे मुस्लिम समाजातील हस्तक व भाजपाचे मुस्लिम आघाडीचे नेते यांना पक्ष संघटनेच्या कार्यकारणीत घेतले. यावरुन आर.एस.एसचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षाच्या कामकाजात झाल्याचे निष्पन्न हाेत आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी माने यांनी केली. तसेच आपण पक्षाच्या सदसत्वाचा आणि पार्लमेंट्री बाेर्डाच्या सदसत्वाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

माने म्हणाले, आरएसएसचा प्रत्यक्ष हस्तक्षेप पक्षामध्ये दिसून येत आहे. आरएसएसमध्ये वाढलेल्या गाेपीचंद पडळकर यांना लाेकसभेची उमेदवारी देण्यात आली तसेच त्यांना पक्षाचे महासचिव पद देखील देण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यशैलीबाबत माझे मतभेद आहेत. आंबेडकरांसारखी माझी कार्यपद्धती नाही. माझी घुसमट झाली तेव्हा मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बेरजेचं राजकारण करायचं आहे.  प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत, त्यांच्याबद्दल मी काही वाईट बाेलणार नाही. परंतु आम्ही एकत्र काम करणं शक्य नाही. लाेकसभेचे सर्व उमेदवार आंबेडकरांनी स्वतःच निवडले. लाेकसभेला आमचे निर्णय चुकले. काॅंग्रेससाेबत आघाडी केली असती तर आमच्या तीन ते चार जागा आल्या असत्या. परंतु लाेकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी आंबेडकरांवर टाकत नाही. ती आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यावेळी मला काही बाेलता आले नाही कारण मी पक्षाच्या चाैकटीत हाेताे. आता मी हे सांगताेय कारण मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. 

मी आता पक्षातून बाहेर पडलाेय. त्यामुळे मी स्वतंत्र वाट निवडणार. भाजप शिवसेनेला मदत हाेईल असे काही करणार नाही. आम्हा वंचितांना सत्तेत जायचे आहे. आंबेडकरांकडे जाऊन देखील सत्तेत जाणार नसू तर आम्ही आमची स्वतंत्र वाट निवडू. यासाठी विधानसभेसाठी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करु तसेच आरपीआयच्या विविध गटांशी देखील चर्चा करु. प्रकाश आंबेडकरांना 248 जागा लढवायच्या असतील तर मी त्यांच्या साेबत जाणार नाही. मी राजकारण लेफ्ट टू दी सेंटर करताे. काॅंग्रेसला 44 जागांची ऑफर देणं हे काॅंग्रेसचा अपमान करणारं आहे. काॅंग्रेसशी मैत्री करायची असेल तर अशी भाषा याेग्य नाही. त्यामुळे आंबेडकरांनी काॅंग्रेस राष्ट्रवादीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्या साेबत राहीन असे माने यांनी सांगितले.एमआयएमचा उपयाेग झाला नाही. लाेकसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा उपयाेग झाला नाही असे माने यांनी सांगितले. त्यांचा उपयाेग झाला असता तर साेलापूरातून प्रकाश आंबेडकर निवडूण आले असते. परंतु तसे झाले नाही. असे माने यांनी सांगितले.

...तर प्रकाश आंबेडकरांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेनप्रकाश आंबेडकर यांनी सतरंजा उचलायला सांगितल्या तरी उचलेन परंतु त्यांनी तत्त्वाशी तडजाेड करायला नकाे. त्यांनी आघाडीशी याेग्य बाेलणी केली तर त्यांच्यासाेबत राहीन. अशी भूमिका माने यांनी घेतली. 

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण