शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

मला काहीतरी चांगलं करायचंय, पुतणे म्हणून किती दिवस मते मागू : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:24 IST

मला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचे असून पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवारांना लगावला आहे....

शेलपिंपळगाव (पुणे) : शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. मात्र वयाच्या ऐंशीनंतर त्यांनी थांबलं पाहिजे. स्वतः ची तब्बेत सांभाळली पाहिजे. कारण आम्ही कारभार करायला खंबीर आहोत. त्यासाठी आमच्या सारख्या काम करणाऱ्या नेत्यांच्या हातात पक्षाची सूत्रे देऊन पवार साहेबांनी मार्गदर्शन करून आशीर्वाद देणे अपेक्षित होते. परंतु साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला. आता माझं पण वय होतं आलंय. मला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचे असून पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवारांना लगावला आहे.

केंदूर (ता. शिरूर) येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मेघना बोर्डीकर, माजी सभापती प्रकाश पवार, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बँकेचे संचालक निवृत्ती गवारी, भाजप महिला नेत्या जयश्री पलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, माजी उपसभापती सविता पऱ्हाड, भाजपा शिरूर तालुका उपाध्यक्ष भगवान शेळके, उद्योग आघाडी अध्यक्ष रवींद्र गायकवाड, सरपंच अमोल थिटे आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक गावकी - भावकीची नसून देशाची निवडणूक आहे. त्यामुळे विरोधक तुम्हाला भावनिक साद घालतील. मात्र आपण आता भावनिक होऊ नका. शरद पवार आमचे पण दैवत आहे. मात्र विकासकामे करायची असतील तर मोदींचे हात बळकट करावे लागणार आहे. केंदूरसह आजूबाजूच्या गावातील पाणीप्रश्न सोडवला जाईल. केंदूर भागात पाहणी करून सोलर प्रकल्प उभारण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र त्यासाठी आपल्या भागातील खासदार दिल्लीला पाठवावा लागणार आहे. 

शरद पवार आमचे नेते...

एकीकडे आदरणीय शरद पवार आमचे नेते आहेत. मात्र वयानुसार त्यांनी थांबलं पाहिजे असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही असाही टोला अजित पवारांनी भर सभेत शरद पवारांना लगावला. 

व्यंकटेश साखर कारखाना सुरू मग घोडगंगा बंद कसा पडतो?....

घोडगंगा साखर कारखाना आमदार अशोक पवारांनी काढलेल्या कर्जामुळे बंद पडला आहे. मात्र तो बंद पडण्यामागे माझं नाव घेतलं जाणार असेल तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही. कारण मी कोणाच्या चहालाही मिंढा नाही. मी आरोप सहन करणार नाही. एकीकडे व्यंकटेश साखर कारखाना सुरळीतपणे चालतो, मग घोडगंगा साखर कारखाना का चालू शकत नाही ? असाही प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshirur-pcशिरूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४