शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मी काहींना टाईमपास पक्ष समजत होतो; त्यांना आता तरी थोडे काम मिळालंय, आदित्य ठाकरेंचे मनसेवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:35 IST

एमआयएम ही भाजपची बी टीम, तर मनसे ही सी टीम

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आघाडीवर टिकाही केली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरे आणि मनसेवर निशाणा साधला आहे. आणि नाव न घेता टीका केली आहे. काहींना मी टाइमपास पक्ष समजत होतो. त्यांना आता तरी थोडे काम मिळाले आहे असं ते म्हणाले आहेत. एका माध्यमाच्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, एमआयएम ही भाजपची बी टीम, तर मनसे ही सी टीम आहे. काहींना मी टाइमपास पक्ष समजत होतो. त्यांना आता तरी थोडे काम मिळाले आहे, अशी मनसेचे नाव न घेता अदित्य यांनी टीका केली. 

महाराष्ट्रात असं राजकारण कधीही नव्हते

राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात हिंदुत्व यावर भाष्य केले होते. त्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, आमचे हिंदुत्व हे वचन पूर्ण करण्यासाठी आहे. राज ठाकरे यांना हिंदू- मुस्लीम दंगे करून यांना सरकार स्थापन करायचे आहे. महाराष्ट्रात असं राजकारण कधीच नव्हते, विरोधी पक्षाला नैराश्य आले आहे. महागाई लपविण्यासाठी राजकीय आरोप केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का? अजित पवारांनी उपस्थित केला होता सवाल 

राज ठाकरे नुसती पवार साहेबांवर टीका करतात, एकेकाळी पवार साहेब यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी कौतुक केलं अन आता टीका करतात. मुलाखत घेतली त्यावेळेस पवार जातीवादी वाटले नाहीत. आताच त्यांना जातीवादी वाटायला लागले. पवार साहेब आताच राजकारणात नाहीत. याचं जन्म नव्हता तेव्हा पवार साहेब राजकारण करायला लागले आणि त्यामुळे अशा लोकांनी टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती त्याच्याकडे एक नकलाकार म्हणून पाहिल जात. नकला करून लोकांना हसवून महाराष्ट्रातील प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल ठाकरे यांनी पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा