शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मी स्वत: व्यासपीठावर होतो, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 18:41 IST

देहू संस्थान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती

मुंबई - संत तुकाराम महाराज पादुका चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळ, ढोलकी वाजवत भजन कार्यक्रम केला. रस्त्यावर बसून आणि कपाळाला काळं गंध लावून या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र भाजपचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अजित पवारांना बोलू न दिल्याने महाराष्ट्राचा अपमान झाल्याची टिका केली आहे. याबाबत, स्वत: त्या व्यासपीठावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, हा अतिशय साधा विषय आहे, यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला?, असा प्रतिप्रश्न पाटील यांनी केला.  

देहू संस्थान इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मात्र पंतप्रधान यांच्या भाषणाआधी अजित पवार यांचं भाषण न घेता देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी आंमंत्रित करण्यात आलं. पवार यांना भाषणासाठी नाकारण्यात आलं. ज्यानंतर पवार काही न बोलताच बसून राहिलेत. पंतप्रधान यांनी पवार यांच्या भाषणाची आठवण मंचावर करून दिली. मात्र, स्वाभिमानाखातर पवार यांनी बोलण्यास नकार दिला. याच प्रकाराचा निषेध करत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भजनाचा कार्यक्रम पुण्यात घेतला. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच, अजित पवारांनी स्वत:च बोलणार नसल्याचे म्हटले होते, असेही त्यांनी सांगितले. 

''असं जर खरं असतं तर अजित पवार एकदा तरी बोलले असते. बसण्याची रचना अशी होती की, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अजित पवार आणि मी. संयोजकांनी नरेंद्र मोदींचं नाव घेतलं तेव्हा मोदी जागेवरुन उठलेच नाहीत. तेव्हा अजित पवारांना मोदींनी बोलण्याचा आग्रह केला होता. मात्र, अजित पवारांनी नकार दिला. तसेच, मी अगोदरच बोलणार नसल्याचं सांगितलं आहे, असे अजित पवारांनी म्हटले. विशेष म्हणजे हे आपण सर्वांनी टिव्हीवरही पाहिलं. 

दरम्यान, प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये, हा अतिशय साधा विषय आहे. अपमानाचा विषयच नाही, अजित पवारांना बोलायला नाही मिळालं, त्यात महाराष्ट्राचा अपमान कुठं आला. हा अनावश्यक वाद निर्माण केला आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी