शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मी सत्तेसाठी हापापलेलो नाही; रोहित पवारांना दिलीप वळसे पाटलांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:41 IST

माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही

मंचर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत घेतलेली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शरद पवार यांचे कट्टर समर्थक तसेच मर्जीतले म्हणून वळसे पाटील ओळखले जातात. त्यानंतर रोहित पवारांनी  दिलीप वळसे पाटलांचा लेखाजोखा ट्विटर वर मांडून त्यांना प्रश्न विचारला होता. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. साहेबानी तुम्हाला अजून काय द्यायला पाहिजे होत? असं रोहित पवार म्हणाले होते. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी उत्तर दिले आहे. मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आज वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडी बाबत भाष्य केले. 

रोहित पवारांच्या पोस्टला उत्तर देत वळसे पाटील म्हणाले,  रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे. तुम्हाला साहेबांनी अजून काय द्यायला पाहिजे होते. साहेबांनी मला सर्व काही दिले आहे. जीवनभर मी त्यांचा कृतज्ञ राहील. रोहित यांची भेट झाली असता मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी आमदारकी सोडतो तुम्ही येथे उभे राहा. माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही. ते पुढे म्हणाले, मी सत्तेसाठी हापापलेलो नाही. तालुक्यातील जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते सगळे सोडवायचे आहेत. आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. त्यांच्यावर रागही नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. कारखाना, बंधारे, बँका हे सर्व करताना ते पवार यांच्यामुळे झाले माझ्यामुळे नाही हे मी नेहमी सांगतो. 

अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही

पवार यांची सभा असेल तर सर्वांनी जावे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. देवदत्त निकम याचे नाव न घेता निष्ठेचा प्रश्न काही लोकांनी तयार केला आहे. दहा वर्षे कारखान्याचा अध्यक्ष, सात वर्ष बाजार समितीचे सभापती, लोकसभेला तिकीट देऊनही आता वेगळी भूमिका घेतली. त्यांनी ती घेऊ नये हे माझे म्हणणे नाही. कोणाच्या डोक्यात असेल तर त्यांनी स्वतःचे नशीब आजमावे. पक्षाकडून सत्तेची पदे घेऊन प्रत्येक गावात जाऊन दुफळी गटतट  करण्याचे काम त्यांनी केले आहे. अनेक वेळा सांगूनही त्यांनी ऐकले नाही असा टोला वळसे पाटील यांनी लगावला. परिसराच्या प्रगतीसाठी काम करत राहू असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार