शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण गाजावाजा करत नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:26 IST

मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. दर्शन घेतल्यावर जगाला कळावे याला काही अर्थ नाही

पुणे : मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण मी त्याचा गाजावाजा करीत नाही. पांडुरंगाचे दर्शन घ्यायला गेल्यानंतर जगाला कळावे याला काही अर्थ नाही. मी दर्शन घेताे, दाेन मिनिटे तिथे थांबतो आणि निघून जाताे. याचे जे मानसिक समाधान असते ते प्रसिद्धीपेक्षा मोठे असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाच्या समारोप साेहळ्यात पवार बाेलत हाेते. यावेळी संमेलनाध्यक्ष व संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे उपस्थित हाेते. दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य वाटप, तसेच वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल वारकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 पवार म्हणाले, वारकरी संमेलनातून समाजमन तयार करणे आणि ते पुराेगामी विचारावर आधारित असले पाहिजे. राज्यात वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक आघाडी या नावाने काम करणारे अनेक लाेक आहेत. मात्र, त्यांचे कीर्तन, विचार ऐकायचा प्रसंग येताे. तेव्हा मी फार अस्वस्थ हाेताे. ज्यांनी सामाजिक ऐक्य घडविणे, कर्मकांड, जुन्या प्रवृत्ती याच्याविराेधात भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तेच जात, पात, धर्म याची एक वेगळी भूमिका जनमानसासमोर मांडतात आणि त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसत असेल तर ताे खऱ्या अर्थाने ताे वारकरी सांप्रदायाचा विचार नाही. आशा लाेकांची संख्या वाढली असून, ते आपले विचार जाहीरपणे मांडतात आणि पिढ्यानपिढ्या एकसंघ राहणाऱ्या समाजात छाेट्या प्रसंगावरून कटुता निर्माण करीत आहेत.

संतांच्या विचारांत शांतता, बंधुभाव निर्माण करण्याची ताकद

संतांनी आपल्याला दिलेले प्रचंड वैचारिक धन ही आपल्या जमेची बाजू आहे. त्यातून एक विचारावर आधारित सामंजस्य निर्माण करणारे मैत्री भाव विस्तारित करणारा जनमानस तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ती संत विचारातून हाेऊ शकताे. जगात आज शांतता आणि बंधुभावाची गरज आहे आणि त्याची पूर्तता करण्याची ताकद माऊली आणि तुकोबांच्या विचार, अभंगात आहे, असेही पवार यांनी सांगितले.

वारकरी एकवटले तर क्रांती हाेणार : संजय आवटे

संत ज्ञानेश्वर ज्या वेळी ‘आता विश्वात्मके देवे’ म्हणाले तेव्हा अमेरिकेचा जन्मही झाला नव्हता. ही आपली परंपरा आहे. ती लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि संतांची समतेची वाट प्रशस्त करणे गरजेचे आहे. मी वारकरी आहे, पण मला राजकीय भूमिका नाही, तर त्यांना संत कळाले नाहीत. या संतांचे साहित्य, अभंग हे राजकीय स्टेटमेंट हाेते. संतांनी वेगळी वाट शोधणे अन् वेगळा विचार करायला शिकविले. आपण नव्या पिढीपर्यंत संत तुकाराम, ज्ञानेश्वर पाेहाेचविले पाहिजेत. वारकरी एकवटले तर क्रांती हाेणारच, असा विश्वास आवटे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारTempleमंदिरPandharpurपंढरपूरSocialसामाजिकPoliticsराजकारण