शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

Sharad Pawar: मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण गाजावाजा करत नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:26 IST

मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. दर्शन घेतल्यावर जगाला कळावे याला काही अर्थ नाही

पुणे : मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण मी त्याचा गाजावाजा करीत नाही. पांडुरंगाचे दर्शन घ्यायला गेल्यानंतर जगाला कळावे याला काही अर्थ नाही. मी दर्शन घेताे, दाेन मिनिटे तिथे थांबतो आणि निघून जाताे. याचे जे मानसिक समाधान असते ते प्रसिद्धीपेक्षा मोठे असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाच्या समारोप साेहळ्यात पवार बाेलत हाेते. यावेळी संमेलनाध्यक्ष व संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे उपस्थित हाेते. दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य वाटप, तसेच वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल वारकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 पवार म्हणाले, वारकरी संमेलनातून समाजमन तयार करणे आणि ते पुराेगामी विचारावर आधारित असले पाहिजे. राज्यात वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक आघाडी या नावाने काम करणारे अनेक लाेक आहेत. मात्र, त्यांचे कीर्तन, विचार ऐकायचा प्रसंग येताे. तेव्हा मी फार अस्वस्थ हाेताे. ज्यांनी सामाजिक ऐक्य घडविणे, कर्मकांड, जुन्या प्रवृत्ती याच्याविराेधात भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तेच जात, पात, धर्म याची एक वेगळी भूमिका जनमानसासमोर मांडतात आणि त्यामुळे सामाजिक ऐक्याला धक्का बसत असेल तर ताे खऱ्या अर्थाने ताे वारकरी सांप्रदायाचा विचार नाही. आशा लाेकांची संख्या वाढली असून, ते आपले विचार जाहीरपणे मांडतात आणि पिढ्यानपिढ्या एकसंघ राहणाऱ्या समाजात छाेट्या प्रसंगावरून कटुता निर्माण करीत आहेत.

संतांच्या विचारांत शांतता, बंधुभाव निर्माण करण्याची ताकद

संतांनी आपल्याला दिलेले प्रचंड वैचारिक धन ही आपल्या जमेची बाजू आहे. त्यातून एक विचारावर आधारित सामंजस्य निर्माण करणारे मैत्री भाव विस्तारित करणारा जनमानस तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ती संत विचारातून हाेऊ शकताे. जगात आज शांतता आणि बंधुभावाची गरज आहे आणि त्याची पूर्तता करण्याची ताकद माऊली आणि तुकोबांच्या विचार, अभंगात आहे, असेही पवार यांनी सांगितले.

वारकरी एकवटले तर क्रांती हाेणार : संजय आवटे

संत ज्ञानेश्वर ज्या वेळी ‘आता विश्वात्मके देवे’ म्हणाले तेव्हा अमेरिकेचा जन्मही झाला नव्हता. ही आपली परंपरा आहे. ती लक्षात घेऊन सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर समजल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि संतांची समतेची वाट प्रशस्त करणे गरजेचे आहे. मी वारकरी आहे, पण मला राजकीय भूमिका नाही, तर त्यांना संत कळाले नाहीत. या संतांचे साहित्य, अभंग हे राजकीय स्टेटमेंट हाेते. संतांनी वेगळी वाट शोधणे अन् वेगळा विचार करायला शिकविले. आपण नव्या पिढीपर्यंत संत तुकाराम, ज्ञानेश्वर पाेहाेचविले पाहिजेत. वारकरी एकवटले तर क्रांती हाेणारच, असा विश्वास आवटे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारTempleमंदिरPandharpurपंढरपूरSocialसामाजिकPoliticsराजकारण