शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
4
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
5
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
6
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
7
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
8
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
9
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
11
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
12
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
14
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
15
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
16
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
17
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
18
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
19
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
20
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना

हुतात्मा राजगुरुंचे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करणार, १०४ कोटींच्या आराखड्याला राज्य सरकारची मान्यता

By नितीन चौधरी | Updated: December 19, 2023 15:05 IST

तब्बल १६ वर्षांनी या स्मारकाच्या आराखड्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे

पुणे : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरूनगर येथील वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा २००७ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी या स्मारकाच्या आराखड्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव १०४ कोटी असून यात स्मारक तसेच परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मारकाचे काम वेगाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देशाच्या स्वातंत्र्यांच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविले, त्या पुणे जिल्ह्यातील शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरूनगर येथे हे स्मारक होणार आहे. राजगुरू यांच्या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याची घोषणा २००७ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली जाईल, असेही आश्वासन दिले होते. त्यानंतर २०१५ मध्ये आराखडा तयार करून प्रत्यक्षात त्याला मान्यता मिळण्यास आठ वर्षांचा कालावधी लागला आहे. जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला. जिल्हास्तरीय समितीने २५४ कोटी ११ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देऊन तो मुख्य सचिवांच्या समितीकडे मान्यतेसाठी पाठविला होता. आराखड्यात प्रस्तावित कामे तीन टप्प्यांत ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत.

नुकत्याच झालेल्या बैठकीत या १०४ कोटी १२ लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सरकारने मान्यता दिली. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामांचा सविस्तर प्रस्ताव सरकारला सादर करावा, अशी सूचना करण्यात आली. दुसऱ्या टप्प्याचा १३६ कोटी ४४ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

स्मारक उभारणीत काय होणार?

- स्मारकाचा जीर्णोद्धार, जन्मखोली, थोरला वाडा तालीम, मुख्य दरवाजा, राम मंदिर इतर- स्मारकातील सुविधा व विकास, सुविधागृह, वाचनालय, उपहारगृह- नदी परिसर सुधारणा, राम घाट, चांदोली घाट, त्याकडे जाणारा दरवाजा- संरक्षित भिंत व वाहनतळ- पदपथ अंतर्गत रस्ते, लँडस्केप क्षेत्र- खुले सभागृह, पुतळे, म्युरल्स- संपूर्ण स्मारकाची प्रकाश व्यवस्था

स्मारकाच्या आराखड्याबाबत समितीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र त्याला निधी मिळत नसल्याने विधीमंडळात गेल्या वर्षी तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. आता राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिल्याने १०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे पुढील दोन महिन्यात निविदा करून काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला आहे. - दिलीप मोहिते पाटील, आमदार ,खेड

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिक