शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरातील भांडण थेट सोशल मीडियातून आले चव्हाट्यावर  !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:25 IST

राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे.

 पुणे : युगंधर ताजणेराजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे. एक मेकांवर केले जाणारे आरोप, मोबाईलवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप, स्क्रीन शॉट हे बिनधास्तपणे आपआपल्या फेसबुक च्या अकाऊंटवर शेयर केले जात आहे. प्रियकर - प्रियसीमधील बेवनाव देखील व्हाटसअप  ‘डीपी’तून सगळयांसमोर येऊ लागला आहे. यामुळे घरातील भांडण थेट सोशल मीडियातून चव्हाट्यावर आले आहे.    आपल्याबद्द्ल लोकांच्या मनात आपुलकी, सहानुभुती, प्रेम तयार व्हावे यासाठी सातत्यपूर्वक अनेकजण एकमेकांवर भांडणाचे उट्टे सोशल मीडियावर काढतात. याशिवाय काही केल्या स्वत:चे अस्तित्व सिध्द करणे ही दोघांकरिता अस्मितेची बाब होऊन बसत असल्याने सामाजिक माध्यमांवर पती-पत्नीबरोबरच जोडप्यांची भांडणे होत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना भगिनी हेल्पलाईनच्या प्रमुख व अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, ज्या पध्दतीने सध्या सोशल माध्यमांवर नवरा बायकोची एकमेकांची उणी-दुणी काढताना दिसतात त्यावर एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. ते म्हणजे पूर्वी नवरा असेल किंवा बायको यांना एकमेकांची माहिती काढणे तितकेसे सोपे नव्हते. सोशल माध्यमातून ती मिळवणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे अनेकदा पती पत्नी कोर्टात एकमेकांवरील आरोप सिध्द करण्याकरिता अशाप्रकारचे आरोप समाजमाध्यमांवर प्रसिध्द करतात. दुस-या बाजुला भावनिक आधार शोधण्याकरिता तसेच आपल्यांवरील अत्याचारांबाबत सहानभुती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टस फेसबुकवर शेयर करताना दिसतात.    ‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून होतात टोकाचे आरोप घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा भंग आपल्याकडून होतो असे नवरा बायको किंवा प्रियकर प्रियसीच्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी समोरच्याला देखील आपली मते योग्यरीत्या व्यक्त करण्याचा अधिकार सोयीस्करपणे दोघांना पडत असल्याचे चित्र सोशल माध्यमांवर पाहवयास मिळते. तसेच प्रिन्सिपल आॅफ नँचरल जस्टीस आणि राईट टू हिअर्ड नुसार दुस-या व्यक्तीचे मत विचारात घेणे जरुरीचे आहे. मात्र अनेकदा फेसबुक, व्हाटसअप, इन्स्टाग्राम, टिव्टटरवरुन एकमेकांवर आरोप करुन बदनामी करण्यात आनंद मानला जातो. आपल्याला न्याय मिळावा याकरिता कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी नसल्यानेच  ‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून टोकाचे आरोप केले जातात. सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात नवरा बायको यांच्यातील भांडणाचे पडसाद उमटताना दिसतात. या माध्यमांवर मुळातच सर्वांना फ्री अक्सेस असल्याने त्यावर कुणालाही आपल्या मतानुसार व्यक्त होण्यास वाव आहे. मात्र यामुळे आपण कशापध्दतीने व्यक्त होतो याचे भान पती पत्नी यांना राहत नाही. केवळ पती पत्नीच नव्हे तर प्रियकर- प्रियसी देखील  वेगवेगळया समाजमाध्यमातून भांडत आहेत. संपत चाललेली सहनशक्ती आणि तात्काळ हवे असणारे समाधान यातून रागाला मोकळी वाट करुन देण्याकरिता तरुण पिढी सोशल माध्यमांच्या आहारी जात आहेत. जी गोष्ट संवादातून मिटवली जाऊ शकते ती भांडणातून जगासमोर मांडण्याची क्रेझ वाढत चालली आहे. - अ‍ॅड. डॉ. चिन्मय भोसले (क्रिमिनल आणि सायबर लॉ तज्ञ) 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपSocial Mediaसोशल मीडियाDivorceघटस्फोटRelationship Tipsरिलेशनशिप