शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

घरातील भांडण थेट सोशल मीडियातून आले चव्हाट्यावर  !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 10:25 IST

राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे.

 पुणे : युगंधर ताजणेराजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची? अशा अर्थाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. बदलत्या काळानुसार भांडणाच्या त-हा, पध्दतीत फरक पडला असून आता नवरा बायकोचे भांडण थेट वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाऊन पोहचले आहे. एक मेकांवर केले जाणारे आरोप, मोबाईलवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप, स्क्रीन शॉट हे बिनधास्तपणे आपआपल्या फेसबुक च्या अकाऊंटवर शेयर केले जात आहे. प्रियकर - प्रियसीमधील बेवनाव देखील व्हाटसअप  ‘डीपी’तून सगळयांसमोर येऊ लागला आहे. यामुळे घरातील भांडण थेट सोशल मीडियातून चव्हाट्यावर आले आहे.    आपल्याबद्द्ल लोकांच्या मनात आपुलकी, सहानुभुती, प्रेम तयार व्हावे यासाठी सातत्यपूर्वक अनेकजण एकमेकांवर भांडणाचे उट्टे सोशल मीडियावर काढतात. याशिवाय काही केल्या स्वत:चे अस्तित्व सिध्द करणे ही दोघांकरिता अस्मितेची बाब होऊन बसत असल्याने सामाजिक माध्यमांवर पती-पत्नीबरोबरच जोडप्यांची भांडणे होत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना भगिनी हेल्पलाईनच्या प्रमुख व अ‍ॅड. सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, ज्या पध्दतीने सध्या सोशल माध्यमांवर नवरा बायकोची एकमेकांची उणी-दुणी काढताना दिसतात त्यावर एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. ते म्हणजे पूर्वी नवरा असेल किंवा बायको यांना एकमेकांची माहिती काढणे तितकेसे सोपे नव्हते. सोशल माध्यमातून ती मिळवणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे अनेकदा पती पत्नी कोर्टात एकमेकांवरील आरोप सिध्द करण्याकरिता अशाप्रकारचे आरोप समाजमाध्यमांवर प्रसिध्द करतात. दुस-या बाजुला भावनिक आधार शोधण्याकरिता तसेच आपल्यांवरील अत्याचारांबाबत सहानभुती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टस फेसबुकवर शेयर करताना दिसतात.    ‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून होतात टोकाचे आरोप घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचा भंग आपल्याकडून होतो असे नवरा बायको किंवा प्रियकर प्रियसीच्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी समोरच्याला देखील आपली मते योग्यरीत्या व्यक्त करण्याचा अधिकार सोयीस्करपणे दोघांना पडत असल्याचे चित्र सोशल माध्यमांवर पाहवयास मिळते. तसेच प्रिन्सिपल आॅफ नँचरल जस्टीस आणि राईट टू हिअर्ड नुसार दुस-या व्यक्तीचे मत विचारात घेणे जरुरीचे आहे. मात्र अनेकदा फेसबुक, व्हाटसअप, इन्स्टाग्राम, टिव्टटरवरुन एकमेकांवर आरोप करुन बदनामी करण्यात आनंद मानला जातो. आपल्याला न्याय मिळावा याकरिता कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी नसल्यानेच  ‘इन्स्टंट ग्रँटिफिकेशन’ मधून टोकाचे आरोप केले जातात. सोशल मीडियावर हल्ली मोठ्या प्रमाणात नवरा बायको यांच्यातील भांडणाचे पडसाद उमटताना दिसतात. या माध्यमांवर मुळातच सर्वांना फ्री अक्सेस असल्याने त्यावर कुणालाही आपल्या मतानुसार व्यक्त होण्यास वाव आहे. मात्र यामुळे आपण कशापध्दतीने व्यक्त होतो याचे भान पती पत्नी यांना राहत नाही. केवळ पती पत्नीच नव्हे तर प्रियकर- प्रियसी देखील  वेगवेगळया समाजमाध्यमातून भांडत आहेत. संपत चाललेली सहनशक्ती आणि तात्काळ हवे असणारे समाधान यातून रागाला मोकळी वाट करुन देण्याकरिता तरुण पिढी सोशल माध्यमांच्या आहारी जात आहेत. जी गोष्ट संवादातून मिटवली जाऊ शकते ती भांडणातून जगासमोर मांडण्याची क्रेझ वाढत चालली आहे. - अ‍ॅड. डॉ. चिन्मय भोसले (क्रिमिनल आणि सायबर लॉ तज्ञ) 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपSocial Mediaसोशल मीडियाDivorceघटस्फोटRelationship Tipsरिलेशनशिप