शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नीरा नदीपात्रातील आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 20:56 IST

नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी निरवांगी या ठिकाणच्या पात्रात आमरण उपोषणास शेतकरी बसलेले आहेत.

ठळक मुद्देआणखी तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली, निर्णयाकडे शेतकरी आणि ग्रामस्थांचे डोळे   खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचा संवाद

निरवांगी :  नीरा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, यासाठी उपोषणास बसलेल्या तीन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. या शेतकऱ्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात विशेष वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले आहे.श्रीरंग यशंवत रासकर, वैभव अरुण जाधव, चंद्रकांत साहेबराव फडतरे अशी त्यांची नावे आहेत. तर या पूर्वी अजिनाथ सुदाम कांबळे, शंकर शंभू होळ या शेतकऱ्यांना देखील प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे. नीरा नदीचे पात्र गेले दोन ते तीन महिने पाण्यावाचून कोरडे पडलेले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील कळंब, निमसाखर, बोराटवाडी, दगडवाडी, निरवांगी, खोरोची, चाकाटी, पिटेवाडी, निरनिमगाव, भगतवाडी, सराटी, लमुवाडी, गिरवी, वजरे व नीरानृसिंहपूर, तर माळशिरस तालुक्यातील कळंबोली, पळसमंडळ, कदमवाडी, उंबरेदहिगाव, चाकाटी, कोडबावी, आनंदनगर आदी गावांतील जनता पाण्यासाठी तहानली आहे. मागील काही महिन्यांपासून नदीच्या पात्रात पाणी नाही. जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने हाल होऊ लागले आहेत. नदीपात्रातच पाणी  नसल्याने नदीकिनारी असणाऱ्या विहिरींची पाणीपातळी प्रचंड खालावली आहे, तर काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी निरवांगी या ठिकाणच्या पात्रात आमरण उपोषणास शेतकरी बसलेले आहेत. या उपोषणस्थळी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती तर सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस तालुक्यातील हजारो शेतकरी पाठिंबा देण्यासाठी दररोज येत आहेत. नदीच्या पात्रात आमरण उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नीरा नदीच्या पात्रात किनारी असलेल्या गावातील  महिला व लहान मुलांनाही पाठिंबा दिला. वयोवृद्ध आजी ही नदीच्या पात्रात येऊन धीर देत आहेत. नदीपात्रात उपोषणासाठी बसलेल्या शेतकऱ्यांच्या ठिकाणी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांचा संवाद करून दिला.

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेFarmerशेतकरी