शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Pune News: शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, पावसाअभावी शेकडो हेक्टर पेरणीविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:13 IST

पावसाळ्याचे दिवस सुरू होऊन सुमारे महिना उलटला आहे. जेमतेम पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या....

राजगुरूनगर (पुणे) : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटत आला तरीदेखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वस्तरातून चिंता व्यक्त होत आहे. खेड तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पेरणीअभावी तशीच पडून आहे. पूर्व भागातील गुळाणी, वाफगाव, चिंचबाईवाडी, वरूडे, कनेरसर, दावडी, निमगाव आदी अनेक गावांमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यावर्षीचा खरीप हंगाम हातचा जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

पावसाळ्याचे दिवस सुरू होऊन सुमारे महिना उलटला आहे. जेमतेम पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी अद्याप शिल्लक आहे. ज्यांनी पेरणी केली त्यांचे बी-बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पेरणीचे दिवसही निघून जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरवर्षी जुलै महिन्यात शेतशिवारातील ओढे, नाले पावसाच्या पाण्यामुळे खळखळून वाहतात. यंदा मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ओढे, नाले कोरडेठाक आहेत. पावसाळ्याच्या दिवसात उन्हासारखी स्थिती पाहायला मिळत आहे. ओढे-नाले कोरडेच असल्यामुळे विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत घट होत आहे.

पाऊस लांबल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना चारा टंचाईचे संकट भेडसावणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होतो. यंदा मात्र पाऊसच नसल्याने चारा उगवला नाही आणि उन्हाळ्यात साठवून ठेवलेला चारा संपत आला आहे. त्यामुळे पशुपालकही अडचणीत सापडले आहेत. चाऱ्याची मागणी लक्षात घेता चाऱ्याचे दरही वाढले आहेत. यावर्षी जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जून महिन्यात पेरणी करता आली नाही. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विविध भागात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

पेरणीला उशीर झाल्याने जमिनीत थोडा जरी ओलावा असेल तर शेतकरी पेरणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात भाताचे सरासरी ७७५० हेक्टर क्षेत्रापैकी १० जुलैपर्यंत १५३ हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. सोयाबीनची १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊस