शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

नावळी भूसंपादनाने होणार शेकडो शेतकरी भूमिहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:45 IST

नावळी (ता. पुरंदर) येथे जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे.

नीरा - नावळी (ता. पुरंदर) येथे जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे. एमआयडीसीचा विस्तार, तसेच शेतकऱ्यांचा विरोध हे समीकरण गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून शेवटी शेतक-यांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आज तेराव्या दिवशी सलग उपोषण सुरू असूनही सरकार, तसेच प्रशासकीय अधिकारी शेतकºयांचे प्रश्न समजून घेऊनत्यावर मार्ग काढण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. या भूसंपादनामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असून देशोधडीला लागणार आहेत.भूसंपादन करताना बागायत जमिनी सरकार घेत असून नेमके चार-दोन राजकीय पुढाºयांच्या फायद्यासाठी भूसंपादन शेतकºयांवर लादले जात असल्याचा आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, भूसंपादन अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज करीत येथील शेतकºयांनी भूसंपादनाला विरोध दर्शविला, तसेच गुंठाभरही जमीन देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले; परंतु सरकारने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारात नावळी येथील अनेक शेतकºयांची जमीन जाणार आहे. सरकारने नोकरीचे, तसेच आर्थिक मोबदला देण्याचे मान्य केले; परंतु बागायती जमिनी देणे बेकायदेशीर असतानाही अशा जमिनींचे भूसंपादन करण्यात येत आहे. बड्या आजी-माजी राजकीय पुढाºयांनी या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. येथील भूसंपादन झाल्यावर हे पुढारी करोडपती होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन होण्यासाठी धडपड पाहायलामिळत आहे.टप्पा क्रमांक ५’चे भूसंपादन सुरू असून सध्या लोकशाही की हुकूमशाही सुरू आहे, हेच समजत नाही. आम्ही गरिबांनी काय करावे? शासनाकडून दखल घेतली जात नाही. आम्ही एक गुंठाही जागा देणार नाही. आम्ही जगणार कसे? मुलेबाळे जाणार कुठे? शेवटी चोरी करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये म्हणजे झाले. आमची काळी आई आम्हाला भाजी-भाकरी देते, ती हिसकावून घेऊ नका.- गेनबा म्हस्के, माजी सरपंच, नावळी

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे