शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नावळी भूसंपादनाने होणार शेकडो शेतकरी भूमिहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:45 IST

नावळी (ता. पुरंदर) येथे जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे.

नीरा - नावळी (ता. पुरंदर) येथे जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारासाठी भूसंपादनाची प्रक्रिया काही दिवसांपासून सुरू आहे. एमआयडीसीचा विस्तार, तसेच शेतकऱ्यांचा विरोध हे समीकरण गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून शेवटी शेतक-यांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आज तेराव्या दिवशी सलग उपोषण सुरू असूनही सरकार, तसेच प्रशासकीय अधिकारी शेतकºयांचे प्रश्न समजून घेऊनत्यावर मार्ग काढण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. या भूसंपादनामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असून देशोधडीला लागणार आहेत.भूसंपादन करताना बागायत जमिनी सरकार घेत असून नेमके चार-दोन राजकीय पुढाºयांच्या फायद्यासाठी भूसंपादन शेतकºयांवर लादले जात असल्याचा आरोप करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, भूसंपादन अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी अर्ज करीत येथील शेतकºयांनी भूसंपादनाला विरोध दर्शविला, तसेच गुंठाभरही जमीन देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले; परंतु सरकारने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.जेजुरी एमआयडीसीच्या विस्तारात नावळी येथील अनेक शेतकºयांची जमीन जाणार आहे. सरकारने नोकरीचे, तसेच आर्थिक मोबदला देण्याचे मान्य केले; परंतु बागायती जमिनी देणे बेकायदेशीर असतानाही अशा जमिनींचे भूसंपादन करण्यात येत आहे. बड्या आजी-माजी राजकीय पुढाºयांनी या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. येथील भूसंपादन झाल्यावर हे पुढारी करोडपती होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत भूसंपादन होण्यासाठी धडपड पाहायलामिळत आहे.टप्पा क्रमांक ५’चे भूसंपादन सुरू असून सध्या लोकशाही की हुकूमशाही सुरू आहे, हेच समजत नाही. आम्ही गरिबांनी काय करावे? शासनाकडून दखल घेतली जात नाही. आम्ही एक गुंठाही जागा देणार नाही. आम्ही जगणार कसे? मुलेबाळे जाणार कुठे? शेवटी चोरी करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये म्हणजे झाले. आमची काळी आई आम्हाला भाजी-भाकरी देते, ती हिसकावून घेऊ नका.- गेनबा म्हस्के, माजी सरपंच, नावळी

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे