शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'कोरोना'चा गुणाकार रोखायचा असेल तर एकमेव पर्याय शंभर टक्के लॉकडाऊन : अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 15:35 IST

सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने जुन्नरमध्ये 'कोरोना' चा रूग्ण....

ठळक मुद्देविषाणू प्रसाराच्या आकृतीद्वारे काळजी घेण्याचे आवाहनगुणाकार म्हणजे काय हे सांगणारा एक व्हिडीओ डॉ. कोल्हे यांनी केला सोशल मीडियावर अपलोड

नारायणगाव : लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगत आहेत. तरी देखील त्याचे पालन होत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे आढळलेले 'कोरोना' बाधित रुग्ण आहे, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.    'कोरोना' संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात गेल्यावर विषाणूंचा गुणाकार होतो, असे मुख्यमंत्री आपल्या आवाहनात वारंवार सांगत आहेत. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे एका व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर हा गुणाकार म्हणजे काय हे सांगणारा एक व्हिडीओ खासदार डॉ. कोल्हे यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये गुणाकार कसा होता हे दाखविण्यासाठी एक ग्राफिक्स तयार केला असून त्याद्वारे संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली आहे. डॉ. कोल्हे यांनी डिंगोरे येथील उदाहरण दिले आहे. त्यामध्ये मूळ रुग्ण १७ मार्च रोजी मुंबई वरून जुन्नर येथे आला. तिथे लॉकडाऊनचे पालन न करता तो अनेकांना भेटला. त्यानंतर २७-२८ मार्चला ही व्यक्ती 'कोरोना' बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीला त्रास सुरू झाला. त्यांच्यामध्ये लक्षण दिसायला लागली. ही व्यक्ती १७ मार्च रोजी या एकाच दिवशी तालुक्यातील अनेकांना भेटली होती.  त्या सर्वांना अत्यंत जिकरीने प्रशासनाने शोधले. त्यानंतर त्यातील दोन जणांना कोरोना ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक व्यक्ती ही मुंबईला वास्तव्य करणारी होती, तर दुसरी व्यक्ती डिंगोरे येथे वास्तव्यास होती. डिंगोरे येथील व्यक्तीचे ३० मार्च रोजी विलगीकरण करण्यात आले आणि ३१ मार्च रोजी या व्यक्तीला 'कोरोना'ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.  डॉ. कोल्हे म्हणाले की, डिंगोरे येथील मूळ रुग्णांच्या सानिध्यात १७ मार्च रोजी आली होती. ३० मार्च रोजी या व्यक्तीला लागण झाल्याचे निष्पन्न झाले.  याचा अर्थ १७ मार्च ते ३० मार्च या व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू होता. आता १७ ते ३० मार्च या कालावधीत ही व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आली असेल याचा जर तुम्ही विचार केलात या विषाणूंचा गुणाकार कशा पद्धतीने होतो हे लक्षात येते. त्याहीपेक्षा या आजाराची लक्षण दिसायला सुरुवात होईपर्यंत १४ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो. त्यामुळे ३० मार्चला सकाळी या व्यक्तीच्या संपर्कात जी व्यक्ती आली असेल तिच्यामध्ये लक्षणे दिसण्यासाठी कदाचित १३ एप्रिल उजाडू शकतो. आता १३ एप्रिलपर्यंत या व्यक्तीच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या असतील याचा अंदाज बांधणे कठीण जाते. यातल्या सगळ्यांना विषाणूची लागण झाली असू शकते अथवा एकालाही नाही अथवा काही जणांना लागण झालेली असू शकते. केवळ एका व्यक्तीने लॉकडाऊन न पाळल्यामुळे आज एवढे सगळेजण धोक्यात आहेत आणि एवढ्या सगळ्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण धोक्यात आहेत. .................. 'कोरोना'च्या विषाणूंचा गुणाकार रोखायचा असेल तर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे लॉकडाऊन शंभर टक्के पाळणे. प्रशासनाला सहकार्य करणे. आपण हे सहकार्य कराल. जर कुणी आपल्या संपर्कात आले असेल आणि आपल्यामध्ये लक्षणं दिसत असतील तर तातडीने प्रशासनाला त्याची कल्पना द्या. प्रशासनाला शंभर टक्के सहकार्य करून लॉकडाऊन पाळू या. - खासदार डॉ. कोल्हे.

टॅग्स :narayangaonनारायणगावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेJunnarजुन्नरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस