शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Cyber Police: सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा? पोलिसांनाच माहित नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:17 IST

भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय

भाग्यश्री गिलडा 

पुणे: सायबर तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, आता अडीच लाखांपुढील सायबर फसवणुकीच्या तक्रारी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात नोंदवता येणार आहेत. मात्र, सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा, यासंबंधीची माहितीच येथील अनेक कर्मचाऱ्यांना (सध्या कार्यरत असलेल्या आणि नव्याने दाखल होणाऱ्या) नाही. त्याचबराेबर पाेलिसांमध्ये संगणकासंदर्भात पुरेसे ज्ञानही नसल्याने भरती होणाऱ्या इच्छुकांची संख्या कमी आहे; पण आता अशाच कर्मचाऱ्यांकडे सायबर गुन्ह्यांचा तपास हाेणार असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाण्यात लवकरच आणखी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.

सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास कसा करावा, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळत नसल्याने सायबर गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड होते. सायबर फसवणुकीसारख्या किचकट गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सक्षम यंत्रणेची नेहमीच गरज असते. अशात अपुरे प्रशिक्षण, तसेच तपासासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाचा अभाव असल्याने सायबर ठाणे कशा प्रकारे सायबर गुन्हेगारांचा छडा लावणार, हा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहतो. या पलीकडे सायबर पोलिस ठाण्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केला की, त्यांना लगेच पोस्टिंग मिळते. यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत होत नाही, तसेच भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय असतो. त्यामुळे सध्यातरी सायबर गुन्ह्यांचा तपास रामभरोसेच होत असल्याचे दिसून येते.

सुधारित परिपत्रकामुळे वाढणार सायबर पोलिसांंचा व्याप ...

पोलिस आयुक्तालयाने काढलेल्या आधीच्या परिपत्रकात २५ लाखांपुढील गुन्हेच सायबर पोलिस ठाण्यात नोंदवता येत होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ सायबर पोलिसांना मिळत होता. मात्र, आता सुधारित परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे अडीच लाखांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचे सगळेच गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणार असल्याने सायबर पोलिस ठाण्याच्या कामकाजात वाढ होणार असल्याने, त्यांच्यासमोर मोठे आवाहन उभे राहणार आहे.

सायबर गुन्ह्यांचा उलगडा होण्यास लागणार अधिक कालावधी

सायबर गुन्ह्यांचा तपास लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अपुरे ज्ञान, प्रशिक्षणाचा अभाव आणि पुरेसे साहित्य उपलब्ध नसल्याने सायबर पोलिस ठाण्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे गुन्ह्यांतील आरोपी निष्पन्न होण्याचा दर कमी होऊ शकते, तसेच अशा प्रकारच्या किचकट गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडील असलेल्या गुन्हे तपासांमध्ये व्यस्त असल्याने सहसा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राथमिक चौकशीही पुरेशा वेगाने होत नाही.

प्रशिक्षण सगळ्याच कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे

सायबर गुन्ह्यांचा तपास कसा घ्यावा, यासाठीचे प्रशिक्षण आणि वेळोवेळी तंत्रज्ञानात होणारे बदल यासाठीचे प्रशिक्षण सगळ्याच कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. याचा अभाव असला, तर गुन्हेगार गुन्हे करत जातील आणि पोलिस मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. -सायबर तज्ज्ञ

''सायबर पाेलिसात भरती हाेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मुलाखत अथवा परीक्षा होत नाहीत, मात्र भरती झाल्यानंतर त्यांना त्यांचे काम व्यवस्थित करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. - मिनल पाटील, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, शिवाजीनगर''

''वरिष्ठांचे काम पाहूनच आम्ही सायबर गुन्ह्याच्या तपासाचे काम शिकताे. आम्हाला शिकण्यासाठी अशा प्रकारचे कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही.- एक पाेलिस कर्मचारी'' 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसtechnologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी