शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Cyber Police: सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा? पोलिसांनाच माहित नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:17 IST

भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय

भाग्यश्री गिलडा 

पुणे: सायबर तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, आता अडीच लाखांपुढील सायबर फसवणुकीच्या तक्रारी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात नोंदवता येणार आहेत. मात्र, सायबर गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा, यासंबंधीची माहितीच येथील अनेक कर्मचाऱ्यांना (सध्या कार्यरत असलेल्या आणि नव्याने दाखल होणाऱ्या) नाही. त्याचबराेबर पाेलिसांमध्ये संगणकासंदर्भात पुरेसे ज्ञानही नसल्याने भरती होणाऱ्या इच्छुकांची संख्या कमी आहे; पण आता अशाच कर्मचाऱ्यांकडे सायबर गुन्ह्यांचा तपास हाेणार असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस ठाण्यात लवकरच आणखी कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे.

सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास कसा करावा, याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळत नसल्याने सायबर गुन्हेगारांचा शोध घेणे अवघड होते. सायबर फसवणुकीसारख्या किचकट गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सक्षम यंत्रणेची नेहमीच गरज असते. अशात अपुरे प्रशिक्षण, तसेच तपासासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शनाचा अभाव असल्याने सायबर ठाणे कशा प्रकारे सायबर गुन्हेगारांचा छडा लावणार, हा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहतो. या पलीकडे सायबर पोलिस ठाण्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केला की, त्यांना लगेच पोस्टिंग मिळते. यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत होत नाही, तसेच भरती झाल्यांनतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणे अथवा वरिष्ठ सहकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शिकणे हाच पर्याय असतो. त्यामुळे सध्यातरी सायबर गुन्ह्यांचा तपास रामभरोसेच होत असल्याचे दिसून येते.

सुधारित परिपत्रकामुळे वाढणार सायबर पोलिसांंचा व्याप ...

पोलिस आयुक्तालयाने काढलेल्या आधीच्या परिपत्रकात २५ लाखांपुढील गुन्हेच सायबर पोलिस ठाण्यात नोंदवता येत होते. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ सायबर पोलिसांना मिळत होता. मात्र, आता सुधारित परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे अडीच लाखांहून अधिक रकमेच्या फसवणुकीचे सगळेच गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल होणार असल्याने सायबर पोलिस ठाण्याच्या कामकाजात वाढ होणार असल्याने, त्यांच्यासमोर मोठे आवाहन उभे राहणार आहे.

सायबर गुन्ह्यांचा उलगडा होण्यास लागणार अधिक कालावधी

सायबर गुन्ह्यांचा तपास लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अपुरे ज्ञान, प्रशिक्षणाचा अभाव आणि पुरेसे साहित्य उपलब्ध नसल्याने सायबर पोलिस ठाण्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे गुन्ह्यांतील आरोपी निष्पन्न होण्याचा दर कमी होऊ शकते, तसेच अशा प्रकारच्या किचकट गुन्ह्यांचा शोध कसा घ्यावा, याबाबत मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडील असलेल्या गुन्हे तपासांमध्ये व्यस्त असल्याने सहसा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राथमिक चौकशीही पुरेशा वेगाने होत नाही.

प्रशिक्षण सगळ्याच कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे

सायबर गुन्ह्यांचा तपास कसा घ्यावा, यासाठीचे प्रशिक्षण आणि वेळोवेळी तंत्रज्ञानात होणारे बदल यासाठीचे प्रशिक्षण सगळ्याच कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. याचा अभाव असला, तर गुन्हेगार गुन्हे करत जातील आणि पोलिस मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. -सायबर तज्ज्ञ

''सायबर पाेलिसात भरती हाेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मुलाखत अथवा परीक्षा होत नाहीत, मात्र भरती झाल्यानंतर त्यांना त्यांचे काम व्यवस्थित करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले जाते. - मिनल पाटील, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, शिवाजीनगर''

''वरिष्ठांचे काम पाहूनच आम्ही सायबर गुन्ह्याच्या तपासाचे काम शिकताे. आम्हाला शिकण्यासाठी अशा प्रकारचे कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही.- एक पाेलिस कर्मचारी'' 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसtechnologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी