शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पुण्याला पाणी किती ? उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:46 IST

खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी नियोजन १५ ऑक्टोबरच्या सुमारास केले जाते

पुणे : पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. १ मार्च) कालवा सल्लागार समितीची बैठक घेणार आहेत. त्यात पुण्याच्या पाणीप्रश्नासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. सध्या खडकवासला प्रकल्पात १७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिका निर्धारित कोट्यापेक्षा जादा पाणी वापर करत असल्याच्या कारणावरून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दंड ठोठावला होता, तर लोकसंख्या वाढत असल्याने महापालिकेला पाणी कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यामुळे पाण्याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी नियोजन १५ ऑक्टोबरच्या सुमारास केले जाते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराचा जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जातो. मात्र, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी असल्याने कालवा सल्लागार समितीच अस्तित्वात नव्हती. राज्यात डिसेंबरमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली. अपेक्षेनुसार पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी जिल्ह्यातील पाण्याच्या संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात शहराच्या तसेच पिंपरी व ग्रामीण भागातील पाण्यासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.

तत्पूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे महापालिका निर्धारित कोट्यापेक्षा ज्यादा पाणी वापरत असून पाणीदेखील प्रदूषित करत असल्याच्या कारणावरून महापालिकेला नोटीस बजावली होती. या नोटिशीतून महापालिकेने ७१४ कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

राज्य सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार महापालिकेला साडेअकरा टीएमसी पाणी जलसंपदा विभागाकडून दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात महापालिका मंजूर कोट्यापेक्षा सुमारे साडेपाच ते आठ टीएमसी पाणी जादा उचलत असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे, तर लोकसंख्या वाढत असल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी कोटा वाढवून द्यावा, अशी वारंवार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सध्या खडकवासला प्रकल्पात एकूण १७.१६ टीएमसी अर्थात ५८.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हाच साठा १५.९४ टीएमसी अर्थात ५४.६७ टक्के इतका होता. ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन दहा दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले असून एप्रिलपर्यंत साडेपाच टीएमसी पाणी ग्रामीण भागाला दिले जाणार आहे, तर दुसरे उन्हाळी आवर्तन तीन टीएमसी इतके देण्यात येणार असून शिल्लक साठ्यातून शहर व ग्रामीण भागासाठी नेमके किती पाणी दिले जाईल, याचा निर्णय होणार आहे.

जिल्ह्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी होत आहे. यात पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागाच्या पाण्याबाबत निर्णय होईल. - श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका