शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

पुण्याला पाणी किती ? उद्या होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:46 IST

खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी नियोजन १५ ऑक्टोबरच्या सुमारास केले जाते

पुणे : पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. १ मार्च) कालवा सल्लागार समितीची बैठक घेणार आहेत. त्यात पुण्याच्या पाणीप्रश्नासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. सध्या खडकवासला प्रकल्पात १७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिका निर्धारित कोट्यापेक्षा जादा पाणी वापर करत असल्याच्या कारणावरून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिकेला दंड ठोठावला होता, तर लोकसंख्या वाढत असल्याने महापालिकेला पाणी कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यामुळे पाण्याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाण्याचे दरवर्षी नियोजन १५ ऑक्टोबरच्या सुमारास केले जाते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहराचा जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जातो. मात्र, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी असल्याने कालवा सल्लागार समितीच अस्तित्वात नव्हती. राज्यात डिसेंबरमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली. अपेक्षेनुसार पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी जिल्ह्यातील पाण्याच्या संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात शहराच्या तसेच पिंपरी व ग्रामीण भागातील पाण्यासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.

तत्पूर्वी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे महापालिका निर्धारित कोट्यापेक्षा ज्यादा पाणी वापरत असून पाणीदेखील प्रदूषित करत असल्याच्या कारणावरून महापालिकेला नोटीस बजावली होती. या नोटिशीतून महापालिकेने ७१४ कोटी रुपये जलसंपदा विभागाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

राज्य सरकारने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार महापालिकेला साडेअकरा टीएमसी पाणी जलसंपदा विभागाकडून दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात महापालिका मंजूर कोट्यापेक्षा सुमारे साडेपाच ते आठ टीएमसी पाणी जादा उचलत असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे, तर लोकसंख्या वाढत असल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला पाणी कोटा वाढवून द्यावा, अशी वारंवार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सध्या खडकवासला प्रकल्पात एकूण १७.१६ टीएमसी अर्थात ५८.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हाच साठा १५.९४ टीएमसी अर्थात ५४.६७ टक्के इतका होता. ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन दहा दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आले असून एप्रिलपर्यंत साडेपाच टीएमसी पाणी ग्रामीण भागाला दिले जाणार आहे, तर दुसरे उन्हाळी आवर्तन तीन टीएमसी इतके देण्यात येणार असून शिल्लक साठ्यातून शहर व ग्रामीण भागासाठी नेमके किती पाणी दिले जाईल, याचा निर्णय होणार आहे.

जिल्ह्याच्या कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी होत आहे. यात पुणे, पिंपरी आणि ग्रामीण भागाच्या पाण्याबाबत निर्णय होईल. - श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका