शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

PMC: टाक्यांचा नेमका वापर किती? न वापरण्याची कारणे काय? अतिरिक्त आयुक्तांनी मागितला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:14 IST

६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांंची चांगलीच धावाधाव

पुणे : समान पाणीपुरवठा योजनेतील काम पूर्ण झालेल्या ६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांंची चांगलीच धावाधाव आणि गोंधळ झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. दरम्यान, योजनेतील किती टाक्यांचा खरोखर वापर सुरू आहे, काम पूर्ण होऊनही वापर न होण्याची कारणे काय आहेत, याबाबत खुलासा करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.

पुणेकरांना उच्च दाबाने समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून अडीच हजार कोटी खर्चाची समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. योजनेच्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी ८६ पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार २८८ पाणी मीटर, ७ नागरी सुविधा केंद्रे आणि ५ नवीन पम्पिंग स्टेशन आदी कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाची कामे करण्यास आजवर चारवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

आतापर्यंत ८६ पाणी साठवण टाक्यांपैकी ६५ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १० टाक्यांची कामे ५० टक्के पूर्ण झाली असून, ९ टाक्यांची कामे ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे २० टक्क्यांच्या आसपास झाली आहेत. दोन टाक्यांना अद्याप जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे. काम पूर्ण झालेल्या ६५ पैकी केवळ २२ टाक्यांचा वापर पाणीपुरवठ्याच्या कामासाठी सुरू आहे. उर्वरित ४३ टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या व वितरण करणाऱ्या वाहिन्या जोडलेल्या नाहीत. त्यामुळे या टाक्यांचा वापर होत नाही.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने जानेवारीमध्ये माहिती अधिकारात कामे पूर्ण झालेल्या टाक्यांपैकी केवळ कात्रज येथील सर्व्हे नं. १२७ येथीलच एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे उत्तर दिले होते. तेच प्रशासन एका महिन्याच्या अंतराने २२ टाक्यांचा वापर सुरू असल्याचे सांगत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पाणीपुरवठा विभागात चांगलीच खळबळ माजली. संबंधित माहिती अधिकारात काय माहिती मागवण्यात आली होती, काय माहिती देण्यात आली, हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच पाण्याच्या टाक्यांच्या वापरासंदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले.

समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. काम पूर्ण झालेल्या किती टाक्यांचा वापर सुरू आहे, इतर टाक्यांचा वापर का होत नाही, याच्या कारणासह खुलासा करण्यास सांगितले आहे. - पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तWaterपाणीDamधरण