शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कितीतरी मोदी येतील अन् जातील; पण मी 'मनु'वाद अन् 'मनी'वादाला घाबरणार नाही: बी.जी.कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 21:57 IST

आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल..

पुणे : जात, पंथ, धर्म, नेता आपले शोषण करत आहेत. या व्यवस्थेला मोडले पाहिजे. मनुवादाला संपवले पाहिजे. पण तीच दिवसेंदिवस प्रबळ होत चालली आहे. आपले नेता आपल्याला पुढे येऊ देत नाहीत. मी पोलीस, मरणाला घाबरत नाही. कितीतरी मोदी येतील अन् जातील पण 'मनु'वाद आणि 'मनी'वादाला घाबरणार नाही. आपण सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायाविरुद्ध लढत राहू, असे मत निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. 

पुण्यात स्वारगेट गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कोळसे पाटील म्हणाले, आपण मालक होऊ शकत नाही कारण आपण संघटित नाही..ही नवी पेशवाई काय आहे? असा प्रश्न मला विचारला जातो.. 'ते' बरोबर नियोजन करतात आणि आपण भांडत बसतो. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात झेंडा फडकवणारा मोदींचा माणूस होता असा पुनरुच्चार कोळसे पाटील यांनी केला. आपण प्रश्न केले नाहीत तर घरात सडून मरू. प्रश्न विचारले तर ताकद निर्माण होईल असेही ते म्हणाले.

निवृत्त पोलीस अधिकारी एस.एम मुश्रीफ म्हणाले, एल्गार म्हणजे युद्धाचे आव्हान. हे आव्हान कुणाला आहे याबाबत स्पष्टता हवी आहे. हे युद्ध विषमतावादी ब्राह्मण व्यवस्थेविरुद्धचे आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला कधी गांभीर्याने घेतले नाही. ब्राह्मणवादावर टीका केली तर गुन्हा दाखल होत असेल तर महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा.कारण त्यांनी कायम ब्राह्मणवादाविरोधात लढा दिला.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीElgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिस