शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

कारागृहातून सुटल्यानंतर गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून मिरवणूक निघतेच कशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 21:35 IST

‘पोलीस म्हणजे गणवेशातले सरकार असते...

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर एका गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून निवडणूक निघते. ही बाब सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. अशा कोणत्याही स्वरूपात गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये. कारण त्यांचा आदर्श तरूण पिढी घेते. पोलिसांनी असे प्रकार अजिबात खपवून घेऊ नयेत. चोर आणि गुन्ह अनोखा गारांवर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस खात्याला सुनावले.  ‘पोलीस म्हणजे गणवेशातले सरकार असते. पोलीस सामान्यांशी कसे वागतात यावर सरकार ठरते. त्यामुळे सामान्यांवर वचक न ठेवता त्यांच्या तक्रारींचे निवारण करायला हवे असेही ते म्हणाले. 

घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यात चोरट्यांकडून पुणे पोलिसांनी जप्त केलेला ऐवज तसेच मुद्देमालाचे वाटप शुक्रवारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील तक्रारदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात पोलिसांनी ६० तक्रारदारांना एक कोटी २० लाख रुपयांच्या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले तसेच कोरोनाच्या संसर्गात मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांचा अनुकंपा तत्वावर पोलीस दलात समावेश करण्यात आला असून प्रातिनिधीक स्वरुपात त्यांना पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, डॉ. जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते. 

मध्यंतरी औंध भागात चोरांना पाहून पोलीस पळाल्याची ध्वनीचित्रफित पाहण्यात आली त्याचा दाखला देत पवार म्हणाले, या प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते आणि चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. पवार यांनी सामान्य नागरिकांनाही खडे बोल सुनावले. तुमचा एवढा माल चोरीला जातोच कसा? महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना भान ठेवावे. बाहेरगावी सहकुटुंब जाताना सोशल मीडियावर फोटो टाकले जातात. त्यातून चोरांचे अधिकच फावते. कृपया असे करू नका. हेच पोलिसांनी शोधून काढलेले दागिने घालून पुन्हा बाहेर जाणार आणि चोरट्यांकडून ते चोरीला जाणार. हे पुन्हा घडले तर चोरांना नाही तर तुम्हाला पकडणार.अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणे हे सर्वांचेच काम आहे असेही ते म्हणाले.-------------------------------------पुणे, मुंबईसह राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे बाधित झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाचा आढावा घेऊन कशी आखणी करायची यावर मार्ग काढणार आहोत. पुढील काळात काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत मी रविवारी (दि.21 ) जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.---

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार