शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कारागृहातून सुटल्यानंतर गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून मिरवणूक निघतेच कशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 21:35 IST

‘पोलीस म्हणजे गणवेशातले सरकार असते...

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर एका गुंडाची कोथरूडपर्यंत मोटारींच्या ताफ्यातून निवडणूक निघते. ही बाब सामाजिक आरोग्यासाठी योग्य नाही. अशा कोणत्याही स्वरूपात गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये. कारण त्यांचा आदर्श तरूण पिढी घेते. पोलिसांनी असे प्रकार अजिबात खपवून घेऊ नयेत. चोर आणि गुन्ह अनोखा गारांवर पोलिसांचा वचक असलाच पाहिजे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस खात्याला सुनावले.  ‘पोलीस म्हणजे गणवेशातले सरकार असते. पोलीस सामान्यांशी कसे वागतात यावर सरकार ठरते. त्यामुळे सामान्यांवर वचक न ठेवता त्यांच्या तक्रारींचे निवारण करायला हवे असेही ते म्हणाले. 

घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यात चोरट्यांकडून पुणे पोलिसांनी जप्त केलेला ऐवज तसेच मुद्देमालाचे वाटप शुक्रवारी वेगवेगळ्या गुन्ह्यातील तक्रारदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात पोलिसांनी ६० तक्रारदारांना एक कोटी २० लाख रुपयांच्या मुद्देमालाचे वाटप करण्यात आले तसेच कोरोनाच्या संसर्गात मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांचा अनुकंपा तत्वावर पोलीस दलात समावेश करण्यात आला असून प्रातिनिधीक स्वरुपात त्यांना पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, डॉ. जालिंदर सुपेकर, नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते. 

मध्यंतरी औंध भागात चोरांना पाहून पोलीस पळाल्याची ध्वनीचित्रफित पाहण्यात आली त्याचा दाखला देत पवार म्हणाले, या प्रकारांमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळते आणि चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. पवार यांनी सामान्य नागरिकांनाही खडे बोल सुनावले. तुमचा एवढा माल चोरीला जातोच कसा? महिलांनी दागिने घालून बाहेर पडताना भान ठेवावे. बाहेरगावी सहकुटुंब जाताना सोशल मीडियावर फोटो टाकले जातात. त्यातून चोरांचे अधिकच फावते. कृपया असे करू नका. हेच पोलिसांनी शोधून काढलेले दागिने घालून पुन्हा बाहेर जाणार आणि चोरट्यांकडून ते चोरीला जाणार. हे पुन्हा घडले तर चोरांना नाही तर तुम्हाला पकडणार.अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. कायदा सुव्यवस्था उत्तम राखणे हे सर्वांचेच काम आहे असेही ते म्हणाले.-------------------------------------पुणे, मुंबईसह राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे बाधित झाले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाचा आढावा घेऊन कशी आखणी करायची यावर मार्ग काढणार आहोत. पुढील काळात काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत मी रविवारी (दि.21 ) जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.---

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार