शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सूर्योदय पाहायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन मुली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:45 IST

नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरील दुकानांना जोरदार धडकली...

सासवड : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली असून पुण्यातील एमआयटी काॅलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरील दुकानांना जोरदार धडकली. या भीषण अपघातात गौरव जितेंद्र ललवाणी, रा. रायपूर, (छत्तीसगड) आणि रजत मोहता, कलकत्ता (पश्चिम बंगाल) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

साकेत ढागा, रोहित कुमार, वसुंधरा रस्तोगी, पूर्वी सिंग, ओमिया सिंग (हे पाच जण विविध प्रांतातील असून पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) सर्वांना जखमी अवस्थेत अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अपघातातील सर्व विद्यार्थी देशाच्या विविध भागांतील असून पुणे येथे एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. यामधील मयत दोघे बी कॉममध्ये असून इतर विविध पदवीचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पुरंदर तालुक्यातील बोपगावमधील कानिफनाथ मंदिरापासून सूर्योदय पाहायचा असल्याने एक्सयूव्ही ३०० ही गाडी भाड्याने घेऊन सोमवार, दि. ३ रोजी पहाटे पुणे कापूरहोळमार्गे नारायणपूरवरून सासवडच्या दिशेने येत होते. पहाटे चारच्या दरम्यान नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून हॉटेल मेघमल्हार आणि शिवलक्ष्मी व्हरायटीज या दुकानावर जाऊन आदळली.

भल्या पहाटे जोरदार आवाज झाल्याने श्रीदत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ बोरकर, भानुदास बोरकर, सचिन झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. समोरचे दृश्य पाहून लगेचच परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. तसेच पोलिसांना फोन करून जखमींना पुणे येथे पाठवून दिले. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दोन मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तर आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक मुन्ना शिंदे यांनी मृतदेह त्यांच्या राज्यात नेण्यासाठी सर्व व्यवस्था केली. सासवड पोलीस स्टेशनचे वतीने पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड