शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सूर्योदय पाहायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तीन मुली जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:45 IST

नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरील दुकानांना जोरदार धडकली...

सासवड : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली असून पुण्यातील एमआयटी काॅलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार झाले. नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून समोरील दुकानांना जोरदार धडकली. या भीषण अपघातात गौरव जितेंद्र ललवाणी, रा. रायपूर, (छत्तीसगड) आणि रजत मोहता, कलकत्ता (पश्चिम बंगाल) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

साकेत ढागा, रोहित कुमार, वसुंधरा रस्तोगी, पूर्वी सिंग, ओमिया सिंग (हे पाच जण विविध प्रांतातील असून पूर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) सर्वांना जखमी अवस्थेत अधिक उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अपघातातील सर्व विद्यार्थी देशाच्या विविध भागांतील असून पुणे येथे एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. यामधील मयत दोघे बी कॉममध्ये असून इतर विविध पदवीचे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पुरंदर तालुक्यातील बोपगावमधील कानिफनाथ मंदिरापासून सूर्योदय पाहायचा असल्याने एक्सयूव्ही ३०० ही गाडी भाड्याने घेऊन सोमवार, दि. ३ रोजी पहाटे पुणे कापूरहोळमार्गे नारायणपूरवरून सासवडच्या दिशेने येत होते. पहाटे चारच्या दरम्यान नारायणपूरमध्ये आल्यानंतर मंदिराजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून हॉटेल मेघमल्हार आणि शिवलक्ष्मी व्हरायटीज या दुकानावर जाऊन आदळली.

भल्या पहाटे जोरदार आवाज झाल्याने श्रीदत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ बोरकर, भानुदास बोरकर, सचिन झेंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. समोरचे दृश्य पाहून लगेचच परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. तसेच पोलिसांना फोन करून जखमींना पुणे येथे पाठवून दिले. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दोन मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तर आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक मुन्ना शिंदे यांनी मृतदेह त्यांच्या राज्यात नेण्यासाठी सर्व व्यवस्था केली. सासवड पोलीस स्टेशनचे वतीने पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड