शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

"रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी मुक्ताईने पाठवली माऊलींना राखी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:15 IST

मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर, मुक्ताई संस्थान, कोथळी आणि श्री क्षेत्र मेहुन या तीन ठिकाणांहून माऊलींना राखी पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत जोपासली जात आहे

भानुदास पऱ्हाड

आळंदी : रक्षाबंधन म्हणजे बहिण - भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग म्हणून ओळखला जातो. यापार्श्वभूमीवर मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर, मुक्ताई संस्थान, कोथळी आणि श्री क्षेत्र मेहुन या तीन ठिकाणांहून माऊलींना राखी पाठविण्यात आली आहे.

तीर्थक्षेत्र आळंदीत रविवारी पहाटे माऊलींच्या संजीवन समाधीला पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. त्यानंतर मुक्ताईने पाठविलेली राखी माऊलींच्या समाधीवर अर्पण करण्यात आली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नातं जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवता आला नाही. मात्र मंदिर देवस्थानने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा सण भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

दरम्यान दरवर्षी रक्षाबंधनच्या पवित्र दिनी मुक्ताई संस्थानकडून माऊलींना राखी पाठवली जाते. मागील अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत जोपासली जात आहे. एरवी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मुक्ताईकडून आलेली राखी माऊलींना अर्पण केली जाते. मात्र मंदिर बंदच्या पार्श्वभूमीवर मोजक्या ब्रह्मवृंदांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरRaksha Bandhanरक्षाबंधनSocialसामाजिक