शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

हिटलर हाच आरएससचा आदर्श तर काँग्रेस करुणा समतेला मानणारा राजकीय पक्ष - हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:13 IST

आरएसस कडून नेहमीच आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत असे सांगितले जाते व त्याचवेळी ते राजकीय पक्ष काढून राजकारणही करतात

पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर्श हिटलर आहे, समता नाकारणारी मनुस्मृती त्यांना महत्वाची वाटते तर काँग्रेस करुणा समतेच्या विचारांना धरून चालते. वैचारिक पातळीवर त्यांना कायमच विरोध करणारा काँग्रेस हा एकमेव देशव्यापी राजकीय पक्ष आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

श्रमिक पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना लक्ष्य केले, त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाऐवजी भाजपचे नेते का पुढे येतात? असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसची राजकीय भूमिका विस्ताराने विषद केल्यावर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. राजकारण सर्वच गोष्टींमध्ये आहे असे स्पष्ट करतानाच त्यांनी काँग्रेसला मास बेस पार्टीबरोबरच आता केडर बेस पार्टीही करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

सपकाळ म्हणाले, “आरएसस कडून नेहमीच आम्ही एक सांस्कृतिक संघटना आहोत असे सांगितले जाते व त्याचवेळी ते राजकीय पक्ष काढून राजकारणही करतात. त्यांनी स्विकारलेली मनुवादी विचारधारा त्यांच्या आधीपासूनची आहे. त्याविरोधात गौतम बुद्ध, भगवान महावीर, व पुढे संत चोखामेळा, संत तुकाराम यांनी संत मंडळींनी विद्रोह केला. सावित्रीबाई यांच्यावर पुण्यात शेणगोळ्यांचा मारा करणारे कोणी पारशी वा मुस्लिम, ख्रिश्चन नव्हते तर मनुवादीच होते. काँग्रेसने या विचारधारेला कायमच विरोध केला.”

काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला अशी टीका केली जाते. काँग्रेस पूर्वीपासूनच मास बेस पक्ष होता. त्यामुळेच जे आले ते सत्तेच्या गादीवर बसले. आता आम्ही काँग्रेसला केडर बेस पक्ष करण्याचा प्रयत्न करत आहोत असे सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPoliticsराजकारणBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी