शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

इतिहासाचे पुनर्लेखन अजेंड्यावर - सुब्रह्मण्यम स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:35 IST

आमचे पुढील काम खरा इतिहास लिहून लोकांसमोर आणण्याचे असेल, असे वक्तव्य भाजपाचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी केले.

पुणे - इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू यांना जेवढे महत्त्व दिले, तेवढे महत्त्व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकरांना मिळाले नाही. आता नेहरूंना विसरून जाण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नव्याने इतिहासाचे पुस्तक लिहिले जात आहे. आमचे पुढील काम खरा इतिहास लिहून लोकांसमोर आणण्याचे असेल, असे वक्तव्य भाजपाचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी रविवारी केले. तसेच पुढील काळात हिंदुत्वाची लाट येईल, असेही त्यांनी नमूद केले.स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदू हेल्पलाइन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित ‘मी सावरकर वक्तृत्व स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ‘राष्ट्रभक्त वीर सावरकर’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंडे, ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय बर्वे, रणजित नातू, शैलेश काळकर, प्रवीण गोखले, अमेय कुंटे आदी उपस्थित होते. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर येथील स्वरदा फडणीस या विद्यार्थिनीला महाविजेता म्हणून पारितोषिक प्रदान करण्यात आले.स्वामी म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढाईत आधी मुस्लिम नंतर ब्रिटिशांविरोधात देशभरातील हिंदू एकजूट होऊन लढले. आजही लढत आहेत. त्यामुळेच देशात ८२ टक्के हिंदू आहेत. इतिहासाच्या पुस्तकात अनेकांची शौर्यगाथा आली नाही. लोकांपर्यंत ती पोहोचू दिली गेली नाही. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्याव्यतिरिक्त पटेल, बोस व सावरकरांनीही विविध माध्यमातून नेतृत्व केले. पण इतिहासात नेहरूंएवढे महत्त्व त्यांना मिळाले नाही. त्यामुळे पुढील काळात खरा इतिहास लिहिणे हे आमचे काम असेल. त्यासाठी पुन्हा पाच वर्षे आम्हाला आणावे लागेल.सावरकरांनी लोकांमध्ये हिंदुत्वाची प्रेरणा जागृत केली. आता सावरकरांचे महत्त्व पटू लागले आहे. पण काँग्रेसने हिंदूंचे विभाजन करून सत्ता मिळविली. २०१४ मध्ये सर्व हिंदू एकत्र आल्याने आपली सत्ता आली. असे स्वामी यांनी सांगितले.सावरकरांवर अन्यायदेशातील जनतेमध्ये हिंदू चेतना व प्रखर राष्ट्रवाद जागविण्याचे काम सावरकरांनी केले. पण काँग्रेसने त्यांना गांधीहत्येचा भाग करून त्यांच्यावर अन्याय केला. खरा इतिहास पुढे येऊ दिला नाही. सावरकरांनी संपूर्ण जीवनाचा देशासाठी त्याग केला, तरीही त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांना न्याय देण्याची सुरुवात आता झाली आहे, असे स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीhistoryइतिहासIndiaभारतPuneपुणे