शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

परिर्वतनाची ऐतिहासिक नांदी..सावित्रीबाई फुले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 07:50 IST

आजमितीला भारतीय स्त्रियांची गरूडभरारी सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पंखात शिक्षणाचे जे बळ भरले आहे त्याचीच फलश्रुती आहे...

भारतीय स्त्री शेकडो वर्षे शिक्षण आणि सामाजिक हक्कापासून वंचित होती. अनेक शतके रुढी परंपरेच्या जंजाळात जखडलेली होती. त्याकाळी पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांची अवहेलना पदोपदी पाहायला मिळत असत. या साऱ्या प्रश्नांची मूळ कारणे तेव्हा क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांना अस्वस्थ करत होती. स्त्रियांच्या मनातील वेदनेचा हुंकार अचूक ओळखून त्यांच्या परिर्वतनासाठी शिक्षणाच्या नंदादीपातून समाजमन प्रज्वलित करण्यासाठी त्यानी सावित्रीला सुशिक्षित केले आणि एका दैदिप्यमान पर्वाची पहाट उदयास आली.. 

अतिशय खडतर कटूमय मार्गातून कणखर व संयमी मनाने स्त्री बलशाली झाली पाहिजे ह्या ध्यासातून त्यांनी केलेल्या अविरत प्रयत्नांपुढे समाजकंटकांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शिक्षणाची दालने महिलांकरिता खुली करून त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनप्रवास साऱ्या विश्वाला प्रेरणादायी आहे.

आजमितीला भारतीय स्त्रियांची गरूडभरारी सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या पंखात शिक्षणाचे जे बळ भरले आहे त्याचीच फलश्रुती आहे. अनेक पिढ्यांचे परंपरेच्या बेड्या झुगारून आपल्या पतीच्या पुरोगामी परिर्वतनवादी विचाराला साथ देऊन स्वतः मध्ये बदल करणे म्हणजे सावित्रीबाईचे धाडसच म्हणावे लागेल. कारण आजही रूढी,परंपरा,व्रत-वैकल्य टिकवण्यासाठी स्त्रिया पुढाकार घेताना दिसून येतात. पण अठराव्या शतकात सावित्रीबाईचे हे पाऊल म्हणजे एक आश्चर्यच आहे.

राज्यात आज राबविण्यात येणाऱ्या अनाथ निराधार, वंचित तसेच संकटात सापडलेल्या महिला यांच्यासाठी सुरू केलेली सूतिकागृह, केंद्र व राज्य शासनामार्फत चालवली जाणारी सखी केंद्रे माहेर योजना, दत्तक विधान योजना, बालगृहे ही सावित्रीबाईच्या महिलांप्रती असलेल्या आत्मनिर्भरतेची साक्ष देतात.

सावित्रीबाई यांनी महिलांच्या शिक्षणाची कठीण काळात केलेली सुरूवात ही एक ऐतिहासिक परिर्वतनाची नांदी आहेच पण त्यांनी लिहिलेलं बावनकशी,  सुबोध रत्नाकर काव्य फुले यातून त्यांच्या मानवजाती प्रती असलेल्या सद्विचाराची जाणीव होते.        

        वाचे उच्चारी। तैसा क्रिया करी        तीच नरनारी। पूजनीय        सेवा परमार्थ। पाळी व्रत सार्थ        होई कृतार्थ। । तेच वंद्य        सुख दुःख काही। स्वर्थपणा नाही        परहित पाही। तोच थोर        मानवाचे नाते । ओळखती जे ते        सावित्री वदते। तेच संत

सावित्रीबाईच्या विचारातून त्यांच्या जाती धर्मा पलीकडच्या वैश्विक कुटुंबाच्या संकल्पनेची प्रचिती येते. जोतीरावांच्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलून पतीचे अर्धवट कार्य, लिखाण कृतीच्या रूपाने पुढे घेऊन जाणारी आणि शेवटच्या श्वासापर्यंत इतरांच्या कल्याणाकरिता देह झिजवणारी सावित्रीबाई आमची राष्ट्र माता आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन शिक्षिका दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम नक्की अभिमानस्पद आहे.

महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या वतीने या क्रांती जोतीस विनम्र अभिवादन..! 

- सुवर्णा पवार -

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली.

टॅग्स :PuneपुणेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेEducationशिक्षणWomenमहिला