शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

हिंजवडीत आयटीयन्सना वाहतूक नियमांचे वावडे, हेल्मेट सक्तीला तिलांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 1:14 AM

समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे.

- रोहिदास धुमाळहिंजवडी : समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे.दुचाकीसह कंपनीत प्रवेश करताना हेल्मेट सक्तीचे आहे. मात्र हेल्मेट नसल्याने आयटी अभियंते बिनधास्तपणे दुचाकी भर रस्त्यावरच पार्क करतात. वाहतूक नियमांना बगल देत आयटी पार्क परिसरात अशा हजारो दुचाकी दररोज भर रस्त्यावर बेकायदा पार्क करतात. वाहतूक नियमांचे वावडे असलेल्या आयटीयन्सकडून वाहतूक पोलिसांनी साडेचार महिन्यांत ६१ लाखांचा दंड वसूल केला आहे.पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, काळेवाडी, सांगवी, ताथवडे, बाणेर, औध यापरिसरातून नोकरीनिमित्त हिंजवडी आयटीपार्कमध्ये रोज हजारोच्या संख्येने ये-जा करतात. त्यासाठी दुचाकीचा सर्वाधिक वापर होत असल्याने वाहतूककोंडी होती. मात्र, वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते. उच्च शिक्षित तसेच परफेक्ट जीवनशैली जगणाऱ्या आयटीयन्सकडे सर्व सामान्य कुतूहलाने पाहतात. त्यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत आपल्या मुलांनासुद्धा उच्च शिक्षित करण्याचे धेय्य बाळगतात. परंतु आयटीयन्सकडून असे नियमांचे उल्लंघन केले जाणार असेल तर ते समाजात काय आदर्श उभा करत आहेत याचे आत्मपरीक्षण व्हावे़आयटीनगरीत येतात दररोज लाखो वाहनेहिंजवडी वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या साडेचार महिन्यांत १२०१८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ६१ लाख ५६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. आयटीपार्क परिसरात १२६ हून अधिक आयटी कंपन्या आहेत. इंजिनिअरिंग, फार्मा व इतर कंपन्या मिळून हा आकडा तीनशेहून अधिक आहे.आयटीनगरीत दररोज सुमारे तीन लाखांहून अधिक आयटीयन्स येत असतात. जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हिंजवडी आयटीपार्कने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात आणि दंड भरण्यात येथील आयटीयन्सची संख्या जास्त आहे. आयटीयन्सला नियमांचे वावडे आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येकावर कारवाई होत असते. मग तो कोणीही असो. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडते. आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी नियम पाळणे महत्त्वाचे आहे. अन्यथा कारवाई अटळ आहे.- किशोर म्हसवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,वाहतूक विभाग, हिंजवडीविना हेल्मेट कंपनीमध्ये प्रवेश दिला जात नाही. हे दुचाकी वापरणाºयांना माहीत आहे. रस्त्यावर दुचाकी पार्क करणे चुकीचे आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरूच असते. त्यामुळे दुचाकीस्वारांवर चपराक बसेल. आयटीपार्कमधील सर्व दुचाकीस्वारांनी किमान स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरले पाहिजे.- संदीप देशमुख, आयटी अभियंता

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे