शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

महाराष्ट्रातील रेल्वेत सर्वाधिक गुन्हे!; एनसीआरबीचा अहवाल, उत्तर प्रदेश १५व्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:05 IST

रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे.

ठळक मुद्देमागील वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंदगुन्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशात पंधराव्या स्थानावर

पुणे : रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण २० टक्के आहे. दरवर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत असून त्यात चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) रेल्वेशी संबंधित गुन्ह्यांची माहिती वार्षिक अहवालात दिली आहे. त्यानुसार मागील वर्षभरात आरपीएफ आणि जीआरपीने संपूर्ण देशभरात सुमारे ११ लाख ३० हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामध्ये आरपीएफने नोंदविलेल्या गुन्हे सर्वाधिक १० लाख ६९ हजार एवढे आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १ लाखाने वाढले आहे. राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यात आरपीएफने नोंदविलेले गुन्हे २ लाख २३ हजार ३६० आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असले तरी महाराष्ट्राच्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण तब्बल एक लाखाने कमी आहे. दर एक लाख लोकसंख्येच्यामागे राज्यातील रेल्वेत १८५ दखलपात्र गुन्हे दाखल होतात. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील गुन्ह्यांचे प्रमाण २१ टक्के आहे. या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. तर लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशात पंधराव्या स्थानावर आहे. जीआरपीने २०१६ मध्ये महाराष्ट्रात ७ हजार ६८४ गुन्हे दाखल केले होते. याबाबतीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल असले तरी लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हांचा विचार केल्यास उत्तर प्रदेश पाचव्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. जीआरपी तसेच आरपीएफने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात दरवर्षी वाढ होत चालली आहे. राज्यात तुलनेने रेल्वेचे जाळे कमी असले तरी घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण मात्र चिंतेची बाब ठरत आहे.

‘आरपीएफ’ने नोंदविलेले गुन्हे : राज्य                          २०१५              २०१६             (एक लाख लोकसंख्येमागे)                                                                               दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाणे१. महाराष्ट्र                १९६६०२         २२३३६०           १८५.३२. उत्तर प्रदेश            १०६५७७        १२४७२०            ५६.९३. मध्य प्रदेश             ८८२२६          ९८९६४              १२६.५४. तामिळनाडू            ७९८५३           ८१६३९             ११७.४५. गुजरात                  ७०८७७          ७७२३०              १२२.४६. आंध्र प्रदेश             ५१०७६           ६९६८९             १३४.७

‘जीआरपी’ने नोंदविलेले गुन्हे :राज्य                       २०१५        २०१६         (एक लाख लोकसंख्येमागे)                                                                        दखलपात्र गुन्ह्यांचे प्रमाण१. उत्तर प्रदेश         ७१६८           १०९१८              ३.८ २. महाराष्ट्र             ७५५६           ७६८४                ६.१३. केरळ                  ६०४६           ७६७८                ०.९४. गुजरात              ६८०४           ६५६१                २.४५. मध्य प्रदेश         ४६४९           ५२५३                ६.५

चोरीचे प्रमाण अधिकरेल्वेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जीआरपीने दाखल केलेल्या २०१६ मधील गुन्ह्यांमध्ये ६ हजार ५५१ गुन्हे चोरीचे होते. तसेच जबरी चोरीच्या २०५ घटना घडल्या आहेत. देशात जबरी चोरीच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात ३८१ समोर आल्या आहेत. दरोड्याचे प्रमाण मात्र महाराष्ट्रातच जास्त आहे. २०१६ मध्ये देशात रेल्वेध्ये दरोड्याच्या ५३ घडल्या होत्या. त्यापैकी सर्वाधिक १३ घटना महाराष्ट्रातील आहेत. तसेच फसवणुक, मारहाण, सार्वजनिक सुरक्षितता, अनधिकृत विक्रेते, रेल्वे मालमत्ता अशा विविध घटनांशीसंबंधित गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीUttar Pradeshउत्तर प्रदेशMaharashtraमहाराष्ट्र