शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

उच्च न्यायालयाने ओढले पाणी वापराबाबत पुणे महापालिकेवर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:50 IST

खडकवासला धरण प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देनियमांचे पालन होत नाही : राज्य शासनालाही फटकारलेमार्च व एप्रिल या दोन महिन्यामध्ये न्यायालयाने विविध तारखांना या याचिकेवर सुनावणीजलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या काही नियमांबाबत पालिकेला आक्षेपजलसंपदा विभागाने या पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये आपले प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर केले सादर

पुणे : पुणे महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमाचे पालन का करत नाही. तसेच राज्य शासनाकडून याबाबत कार्यवाही का केली जात नाही, असा जाब उच्च न्यायालयाने राज्य शासनाला व पालिकेला विचारला. तसेच पालिकेकडून वापरल्या जात असलेल्या अधिकच्या पाणी वापरावर ताशेरे ओढले.खडकवासला धरण प्रकल्पातून पुणे महानगरपालिकेने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी घेणे आवश्यक आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून अधिकच्या पाण्याचा वापर केला जात आहे. परिणामी ग्रामीण भागाला शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नाही. त्यामुळे इंदापूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील यांनी पालिकेच्या अधिकच्या पाणी वापरावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मार्च व एप्रिल या दोन महिन्यामध्ये न्यायालयाने विविध तारखांना या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. बुधवारी (दि.१०)न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये याचिकाकर्ते प्रताप पाटील यांच्या वतीने शकुंतला वाडेकर यांनी तर पुणे महापालिकेच्या वतीने अभिजित कुलकर्णी यांनी बाजू मांडली.  जलसंपदा विभागाने या पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये आपले प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले आहे. त्यात पालिका जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार पाणी वापरत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र,राज्य शासनाने व पुणे महापालिकेने अद्याप न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.पुढील सुनावणी येत्या २४ एप्रिल रोजी होणार आहे.----पुणे महापालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीचे पालन का करत नाही? तसेच शासनाकडून याबाबत कार्यवाही का केली गेली नाही, याबाबत न्यायालयाने जाब विचारला. तसेच पालिकेने पाणी मिळण्यासंदर्भात वेगवेगळ्या माहितीचा पत्रव्यवहार शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे शासनाने बाबात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे,असे आदेश दिले आहेत.पुढील सुनावणी येत्या २४ एप्रिल रोजी होणार आहे.- शकुंतला वाडेकर,याचिकाकर्ता प्रताप पाटील यांच्या  वकिल--पालिका ५० लाख लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर करत आहे. पालिकेने वेळोवेळी शासनाला अधिक पाणी मिळावे याबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. पुणे शहर व परिसरातील गावांमधील लोकसंख्या वाढत असून पालिका प्रशासन आवश्यक तेवढेच पाणी घेत आहे. तसेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या काही नियमांबाबत पालिकेला आक्षेप आहे. त्यामुळे पालिका न्यायालयात यावर दाद मागणार आहे,असे म्हणणे पालिकेच्या वतीने बुधवारी न्यायालयासमोर मांडण्यात आले.-अभिजित कुलकर्णी,पुणे महापालिकेचे वकिल  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीHigh Courtउच्च न्यायालय