शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातून संघाच्या जनकल्याण समितीकडे पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 14:52 IST

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हयात परिस्थिती नियंत्रणाखाली यावी यासाठी शर्थीचे प्रयल चालू आहेत. 

ठळक मुद्दे शेकडो कार्यकर्ते दिवसरात्र करताहेत काम कोल्हापूर जिल्हयात शिरोळ तालुक्यातील 38 हजार व्यक्तींची तात्पुरत्या निवासस्थानात व्यवस्था२२ केद्रांमध्ये एकूण २५० स्त्री-पुरुष कार्यकर्ते मदत कार्यात व्यस्त

पुणे : सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे लाखो नागरिकांना फटका बसला आहे. महाराष्ट्रातील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्यावतीने विविध ठिकाणी मदत कार्य सुरु आहे. राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून शेकडो कार्यकर्ते अहोरात्र मदतकार्य करीत असल्याचे समितीचे प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक यांनी सांगितले. जनकल्याण समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मदतकार्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हयात परिस्थिती नियंत्रणाखाली यावी यासाठी शर्थीचे प्रयल चालू आहेत.  सांगली जिल्ह्यातील मिरज, शिराळा आणि पलूस तालुक्यातील सुमारे ५०,००० नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये हलविण्यात आले असून सुरुवातीला २३५ नागरिकांची सुखरूप सुटका केल्यानंतर आता ३ हजार ५०० नागरिकांची दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.तीन ठिकाणी सुरू केलेल्या केंद्रांतून सुमारे ३०० स्त्री-पुरूष कार्यकर्ते सक्रिय आहेत. हेलिकॉप्टरने सुटका केलेल्या नागरिकांकरिता दर तासाला १ हजार भोजन पाकिटे एनडीआरएफ व जवानांकडे दिली जात आहेत. यासोबतच सातारा जिल्ह्यात सातारा, कराड आणि पाटण येथील १ हजारापेक्षा अधिक नागरिक आपत्तीत सापडले आहेत. समितीने २०० नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था केली. पाटण परिसरात ७० आपदग्रस्तांना रग व चादरींचा पुरवठा केला आहे. २२ केंद्रांत एकूण २५० स्त्री-पुरुष, कोल्हापूर जिल्हयात शिरोळ तालुक्यातील 38 हजार व्यक्तींची तात्पुरत्या निवासस्थानात व्यवस्था केली असून २२ केद्रांमध्ये एकूण २५० स्त्री-पुरुष कार्यकर्ते मदत कार्यात व्यस्त आहेत. दहा आरोग्य तपासणी केंद्रात प्रथमोपचार सुरु असून ६ हजार लिटर पिण्याच्या पाण्यासह कपडे व औषधांचे वितरण सुरु आहे. कोल्हापूर शहर व इचलकरंजी, वारणा कोडोली येथे पुरात अडकलेल्या लोकांना पाण्यातून बाहेर काढून झाल्यावर कोल्हापूरमधील ६ व इचलकरंजी येथील ४ पूरग्रस्त केंद्रांचे संपूर्ण पालकत्व घेण्यात आले आहे. ही सर्व व्यवस्था सर्व व्यवस्था रा.स्व. संघ, जनकल्याण समिती व राष्ट्र सेविका समिती यांच्यातर्फे जरण्यात आली आहे. यासोबतच शहरातील २३ केंद्रांवर ३२ डॉक्टर्स व त्यांच्या सहायकांची पथके कार्यरत आहेत. ======पुणे आणि राज्यभरातून आतापर्यंत २६०० कार्यकर्त्यांनी नाव नोंदणी केली असून सोमवार पासून ३०० च्या गटाने कार्यकर्ते सांगली, कोल्हापूरला जाऊन तीन दिवस गावांमध्ये राहून स्वच्छता करणार आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणांवर भर देण्यात येणार आहे. जवळपास २८० गावांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. या कार्यकर्त्यांसोबत स्वच्छता साहित्यासह आवश्यक औषधे, निजंर्तुके देण्यात येणार असल्याचे शैलेंद्र बोरकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSangliसांगलीkolhapurकोल्हापूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघfloodपूर