शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

अनैतिक संबंधांच्या संशयावरून अपहरण करून तरुणाचा निर्घृण खून, इंदापूर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 17:15 IST

आरोपींना पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे...

इंदापूर (पुणे) : अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना पंधारवाडी (ता. इंदापूर) येथे घडली. खुनानंतर ७० किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात मृतदेह पुरून टाकण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर या खून प्रकरणास वाचा फुटली. पंधारवाडी येथे घडलेल्या प्रकरणात इंदापूर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना पाच डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे.

गणेश लक्ष्मण शिंदे (वय ३३), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय ३०), आकाश सुरेश शिंदे (वय २२, सर्व रा. पंधारवाडी ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. वैभव शिवाजी पारेकर (वय २६,रा. पंधारवाडी) या तरुणाचा या प्रकरणात बळी गेला आहे. त्याचे वडील शिवाजी दामू पारेकर (वय ५५, रा. पंधारवाडी) यांनी इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मंगळवारी (दि.२८) नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी शिवाजी पारेकर हे आपली पत्नी कांताबाई व मुलगा वैभव यांच्या समवेत जेवण करून बसले होते. दरम्यान तीनही आरोपी घरी आले. गणेश शिंदे याने घरात येऊन आपल्याला भांडगाव येथे जायचे आहे. तु आमच्या सोबत चल असे वैभवला सांगितले. वैभवने आपण या तिघांबरोबर भांडगावला चाललो आहोत, असे वडिलांना सांगितले. गणेशने आणलेल्या चारचाकी वाहनातून त्या तिघांबरोबर वैभव निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो आला नाही. त्याची वाट पाहून सकाळची इतर कामे उरकून फिर्यादी आरोपींच्या घरी जावून आले. तेव्हा ते तिघे देखील रात्रीपासून घरी आले नाहीत असे त्यांच्या घरच्यांनी फिर्यादीला सांगितले.

त्यानंतर दि.३० नोव्हेंबरपर्यंत वैभवचा तपास लागला नाही. त्यामुळेच गणेशने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने वैभवला गुप्तपणे अटकेत ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण करून त्याचा घातपात केला असावा अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी आरोपींविरुद्ध इंदापूर पोलिसांत तक्रार केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.

खून केला इंदापुरात, मृतदेह पुरला माण तालुक्यात -

ज्या दिवशी आरोपी वैभवला आपल्या समवेत घेऊन गेले, त्याच दिवशी त्यांनी बाह्यवळण रस्त्यापासून काही अंतरावर बेडशिंगे गावच्या हद्दीत धारदार हत्याराने वार करून त्याला मारून टाकले होते. त्याचा मृतदेह चारचाकीच्या डिकीत रात्रभर ठेवला. घरी आल्यानंतर सकाळी सात ते आठच्या सुमारास ते 'त्या'' चारचाकीतून थेट ७० किलोमीटर अंतर तोडून शिंगणापूरच्या दिशेने गेले. शिंगणापूर ते दहिगाव दरम्यान वावरहिरे (ता. माण जि. सातारा) या गावच्या हद्दीत रस्त्यापासून साधारणतः दोनशे मीटर अंतरावर डोंगरदऱ्यातील माळावर खड्ड्यात त्यांनी वैभवचा मृतदेह पुरला. तेथून ते परत पंधारवाडीत आले. नवरात्र उत्सवाच्या वेळी मृत वैभव आरोपी गणेश शिंदे याच्या घरी आला असता, गणेशने त्याला 'तु माझ्या घरी यायचे नाही, माझ्या बायकोशी बोलायचे नाही' अशी धमकी दिली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे अनैतिक संबंधांच्या संशयावरून हे प्रकरण घडल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारी