शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; धरणांत २०० टीएमसी पाणीसाठा

By नितीन चौधरी | Updated: September 16, 2022 20:13 IST

खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही धरणे १०० टक्के भरली

पुणे : शहर व जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर धरणे पूर्ण भरल्याने नद्यांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारपासून सुमारे ३० हजार ६७७ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. जिल्ह्यातील धरणसाठा आता २०० टीएमसी अर्थात १०१ टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांपैकी वीस धरणे काठोकाठ भरली आहेत. अन्य पाच धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सध्या केवळ माणिकडोह हे एकच धरण ८२ टक्के भरले आहे. तर पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून सायंकाळी ३०६७७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत होता. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतचा इशारा देण्यात आला होता.

जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतका असून, शुक्रवारी सकाळवाजेपर्यंत या सर्व धरणांमध्ये सुमारे २००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा १०१ टक्के इतका झाला आहे. गेल्यावर्षी हाच साठा १७६.२८ टीएमसी अर्थात ८८.८७ टक्के इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा २४.३१ टीएमसीने जास्त आहे, तर एकूण साठ्यात १२.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील भरलेली धरणे

खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, कासारसाई, कलमोडी, चासकमान, आंद्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, वीर, नीरा देवघर, वडज, डिंभे, विसापूर व उजनी (१०८.६६ टक्के).

खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला

खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये शुक्रवारी (ता. १६) सकाळपासूनच विसर्ग सुरू होता. सकाळी हा विसर्ग ६८४८ इतका होता. दुपारी बारा वाजता तो २२,८८० क्युसेकने करण्यात आला. एक वाजेनंतर तो ३० हजार ६७७ क्युसेक करण्यात आला, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय पाटील यांनी दिली. याशिवाय मुळशी धरणातून २६ हजार ४०० क्युसेकने, चासकमानमधून १२ हजार ६५० क्युसेकने, पवना धरणाच्या सांडव्याद्वारे १० क्युसेकने आणि कासारसाई धरणातून एक हजार ३५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणीDamधरणRainपाऊस