शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Pune Rain: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; धरणांत २०० टीएमसी पाणीसाठा

By नितीन चौधरी | Updated: September 16, 2022 20:13 IST

खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही धरणे १०० टक्के भरली

पुणे : शहर व जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर धरणे पूर्ण भरल्याने नद्यांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारपासून सुमारे ३० हजार ६७७ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. जिल्ह्यातील धरणसाठा आता २०० टीएमसी अर्थात १०१ टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांपैकी वीस धरणे काठोकाठ भरली आहेत. अन्य पाच धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सध्या केवळ माणिकडोह हे एकच धरण ८२ टक्के भरले आहे. तर पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून सायंकाळी ३०६७७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत होता. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतचा इशारा देण्यात आला होता.

जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतका असून, शुक्रवारी सकाळवाजेपर्यंत या सर्व धरणांमध्ये सुमारे २००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा १०१ टक्के इतका झाला आहे. गेल्यावर्षी हाच साठा १७६.२८ टीएमसी अर्थात ८८.८७ टक्के इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा २४.३१ टीएमसीने जास्त आहे, तर एकूण साठ्यात १२.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील भरलेली धरणे

खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, कासारसाई, कलमोडी, चासकमान, आंद्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, वीर, नीरा देवघर, वडज, डिंभे, विसापूर व उजनी (१०८.६६ टक्के).

खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला

खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये शुक्रवारी (ता. १६) सकाळपासूनच विसर्ग सुरू होता. सकाळी हा विसर्ग ६८४८ इतका होता. दुपारी बारा वाजता तो २२,८८० क्युसेकने करण्यात आला. एक वाजेनंतर तो ३० हजार ६७७ क्युसेक करण्यात आला, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय पाटील यांनी दिली. याशिवाय मुळशी धरणातून २६ हजार ४०० क्युसेकने, चासकमानमधून १२ हजार ६५० क्युसेकने, पवना धरणाच्या सांडव्याद्वारे १० क्युसेकने आणि कासारसाई धरणातून एक हजार ३५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणीDamधरणRainपाऊस