शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune Rain: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; धरणांत २०० टीएमसी पाणीसाठा

By नितीन चौधरी | Updated: September 16, 2022 20:13 IST

खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही धरणे १०० टक्के भरली

पुणे : शहर व जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर धरणे पूर्ण भरल्याने नद्यांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी दुपारपासून सुमारे ३० हजार ६७७ क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. जिल्ह्यातील धरणसाठा आता २०० टीएमसी अर्थात १०१ टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांपैकी वीस धरणे काठोकाठ भरली आहेत. अन्य पाच धरणांमधील पाणीसाठा प्रत्येकी ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सध्या केवळ माणिकडोह हे एकच धरण ८२ टक्के भरले आहे. तर पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून सायंकाळी ३०६७७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येत होता. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतचा इशारा देण्यात आला होता.

जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता १९८.३४ टीएमसी इतका असून, शुक्रवारी सकाळवाजेपर्यंत या सर्व धरणांमध्ये सुमारे २००.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा १०१ टक्के इतका झाला आहे. गेल्यावर्षी हाच साठा १७६.२८ टीएमसी अर्थात ८८.८७ टक्के इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा साठा २४.३१ टीएमसीने जास्त आहे, तर एकूण साठ्यात १२.१३ टक्क्यांची वाढ झाली आहे. भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.

जिल्ह्यातील भरलेली धरणे

खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, कासारसाई, कलमोडी, चासकमान, आंद्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, वीर, नीरा देवघर, वडज, डिंभे, विसापूर व उजनी (१०८.६६ टक्के).

खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला

खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये शुक्रवारी (ता. १६) सकाळपासूनच विसर्ग सुरू होता. सकाळी हा विसर्ग ६८४८ इतका होता. दुपारी बारा वाजता तो २२,८८० क्युसेकने करण्यात आला. एक वाजेनंतर तो ३० हजार ६७७ क्युसेक करण्यात आला, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय पाटील यांनी दिली. याशिवाय मुळशी धरणातून २६ हजार ४०० क्युसेकने, चासकमानमधून १२ हजार ६५० क्युसेकने, पवना धरणाच्या सांडव्याद्वारे १० क्युसेकने आणि कासारसाई धरणातून एक हजार ३५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणीDamधरणRainपाऊस