शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

त्यांनी तीस दिवसात सायकलवरुन केला सहा हजार किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:58 IST

आराेग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पुण्यातील अवलियाने केला सहा हजाराहून अधिक किलाेमीटरचा सायकलवरुन प्रवास केला.

पुणे : आराेग्य, शांती, पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पुण्यातील अवलीयाने तीस दिवसात तब्बल 6 हजाराहून अधिक किलाेमीटरचा सायकल प्रवास केला आहे. यामध्ये त्यांनी भारतातील 50 हून अधिक महत्त्वाच्या शहरांमधून प्रवास केला. तसेच 13 राज्यांना भेट दिली. 

सुनील कुकडे असे त्यांचे नाव आहे. सुनील हे आपल्या सायकलिंगमधून नेहमीच आराेग्याचा संदेश देत असतात. यंदा त्यांनी हाेप ( हेल्थ, ऑप्टिमिझम, पीस, एनवायरमेंट) चा संदेश दिला. त्यांनी भारतातील सुवर्ण चतुर्भूज महामार्गावरुन प्रवास करण्याचा निर्णय घेतला. 2 डिसेंबर राेजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी या प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली. सायकल आणि पाठीवर कपड्यांच्या बॅगेसाेबत प्रवासाला निघाले. पुणे - मुंबई- अहमदाबाद- जयपुर- नवी दिल्ली- कानपूर- वाराणसी-काेलकाता- भुवनेश्वर- विषाखापट्टणम- चैन्नई- बंगळूर- काेल्हापूर- पुणे असा त्यांनी सहा हजार दाेनशे पंच्चावन्न किलाेमीटरचा प्रवास केला. हा प्रवास करण्यासाठी त्यांना 30 दिवस लागले. दरराेज त्यांनी दाेनशे ते अडीचशे किलाेमीटरचा प्रवास केला. 

या प्रवासात त्यांना अनेक चांगले वाईट अनुभव आले. विशेष म्हणजे या संंपूर्ण प्रवासात त्यांची सायकल एकदाही पंक्चर किंवा नादुरुस्त झाली नाही. जेव्हा नागरिकांना त्यांच्या प्रवासाबाबात माहिती हाेत असे तेव्हा नागरिक त्यांचे अभिनंदन आणि काैतुक करत हाेते. तसेच त्यांना पुढच्या प्रवासासाठी प्राेत्साहन देखील देत हाेते. भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतींचा कुकडे यांना अनुभव घेता आला. ज्या ठिकाणी ते थांबत त्याठिकाणी आराेग्याचा तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत हाेते. 

टॅग्स :PuneपुणेCyclingसायकलिंगhighwayमहामार्ग