शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सहा वर्षांनंतर ताे भेटला कुटुंबियांना ; भावाला शाेधायला पडला हाेता बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 19:35 IST

सहा वर्षापूर्वी भावाच्या शाेधात निघालेला 10 वर्षाचा मुलगा चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आणि पुण्यात येऊन पाेहचला. साथी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबियांचा शाेध घेण्यात आला. तब्बल सहा वर्षांनंतर त्याच्या कुटुंबियांना शाेधण्यात यश आले.

पुणे : सहा वर्षांपूर्वी लुधियानामधून भावाला शाेधण्यासाठी बाहेर पडलेला अवघ्या 10 वर्षाचा चंदन चुकीच्या ट्रेनमध्ये चढला आणि थेट पुण्यात येऊन पाेहचला. एक मुलगा हरवल्याच्या दुःखाच कुटुंबट असतानाच दुसरा मुलगा देखील हरवला. पुण्यात साथी संस्थेला चंदन सापडला. त्याला बालगृहात ठेवण्यात आले. साथी संस्थेच्या प्रयत्नांमुळे सहा वर्षांनंतर चंदनच्या आई वडीलांचा शाेध घेण्यात आला. गुरुवारी चंदनचे पालक त्याला घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले. 

11 फेब्रुवारी 2013 राेजी चंदनचा भाऊ राजू हा आठ वर्षाचा असताना लुधियानामधून हरवला. त्यावेळी चंदन हा अवघ्या 10 वर्षाचा हाेता. त्याच्या वडिलांनी मुलगा हरवल्याची तक्रार पाेलिसांकडे केली. त्यावेळी चंदन देखील त्याच्या भावाचा शाेध घेत हाेता. शाेध घेत असताना चंदन पुण्याला येणाऱ्या ट्रेनमध्ये चढला. पुण्यात आल्यानंतर साथी संस्थेने त्याच्याशी संपर्क केला. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर ताे त्याचे काेलकात्याला घर आहे इतकेच सांगत हाेता. त्यानंतर त्याला शिवाजीनगर येथील बालगृहात ठेवण्याचे आदेश बाल कल्याण समितीने दिले. तेथे चंदन तीन वर्ष हाेता. 

काही कारणात्सव 2017 शिवाजीनगर येथील बालसुधारगृह बंद करण्यात आले. त्यानंतर चंदनची रवानगी मंचर येथील आदिवासी ग्रामीण प्रतिष्ठन संस्था येथे करण्यात आली. तेथे ताे शाळा देखील शिकत हाेता. तेथील काही मुलांसाेबत झालेल्या भांडणामुळे ताे जानेवारी 2019 ला तेथून पळून गेला. तेथून ताे बंगळूर ला पाेहचला. तेथील पाेलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याला बंगळूर येथील सुधारगृहात ठेवण्यात आले. तेथे ताे सहा महिने हाेता. त्यानंतर त्याला पुन्हा मंचर येथील सुधारगृहात आणण्यात आले. पुन्हा काही मुलांसाेबत झालेल्या भांडणातून ताे आणखी दाेन मुलांना घेऊन मंचरच्या सुधारगृहातून पळून गेला. दाेन दिवस चालत त्याने पुणे स्टेशन गाठले. 7 मेला साथी संस्थेला ताे पुन्हा भेटला. त्याला बाल कल्याण समितीसाेर हजर केले असता त्याला साथी संस्थेकडेच ठेवून त्याच्या आई वडिलांचा शाेध घेण्यास सांगण्यात आले. 

साथी संस्थेने अथक परिश्रमातून त्याच्या घरच्यांना शाेधून काढले. गुरुवारी त्याचे पालक त्याला घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले. आपल्या मुलाला सहा वर्षांनंतर पाहून घरच्यांचे डाेळे आनंद अश्रूंनी भरुन गेले हाेते. 

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेMissingबेपत्ता होणं