शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ सनद पडताळणीसाठी अर्जच केला नाही... मागणार सर्वोच्च न्यायालयात दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:41 IST

मुदत संपल्यानंतर राज्यातील ५० हजारांहून अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्जच भरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे दावा दाखल करण्याचा ठराव बार कौन्सिलने केला आहे.

ठळक मुद्देसनद पडताळणी न केलेल्या वकिलांची सनद येणार धोक्यात सनद पडताळणीसाठी मुदतवाढ दिली गेल्यास उर्वरित वकिलांना सनद पडताळणीसाठी अर्ज भरणे शक्य

पुणे : वकिलांची सनद पडताळणीची मुदत संपल्यानंतर राज्यातील ५० हजारांहून अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्जच भरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या वकिलांना यापुढे वकिलीच करता येणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढीची मागणी करणारा दावा दाखल करण्याचा ठराव बार कौन्सिलने केला आहे.बोगस वकिलांना आळा बसावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बार कौन्सिल आॅफ इंडियाला वकिलांची सनद पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक राज्यातील बार कौन्सिलकडून वकिलांची सनद पडताळणी करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होते. सर्वोच्च न्यायालयाने सनद पडताळणीसाठी अंतिम मुदत दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्ज भरले. मात्र, काही वकील ही प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. बहुतांश वकिलांनी सनद पडताळणीचे अर्ज भरण्यासाठी प्रतिसादच दिला नाही. सनद पडताळणी न केलेल्या वकिलांची सनद धोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना काम करता येणार नाही. परिणामी, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवासाठी होणार्‍या निवडणुकीच्या मतदानालाही ते अपात्र ठरतील. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे अ‍ॅडहॉक कमिटीचे सदस्य अ‍ॅड. हर्षद निंबाळकर म्हणाले, की कमिटीकडून नुकताच एक ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या वकिलांना सनद पडताळणी करता आलेली नाही त्यांना मुदत वाढ द्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात येणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यानंतर ही याचिका दाखल करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाकडून सनद पडताळणीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली गेल्यास उर्वरित वकिलांना सनद पडताळणीसाठी अर्ज भरणे शक्य होईल. सनद पडताळणीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांतील बारकौन्सिलच्या निवडणुकादेखील लांबणीवर पडल्या असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाकडे एक लाख ६० हजार वकिलांची नोंदणी होती. त्यांतील ८० हजार वकिलांचे सनद पडताळणीसाठी अर्ज आले होते. त्यांतील ३० हजार वकील हयात नाहीत, असे गृहीत धरले तर उरलेल्या ५० हजारांहून अधिक वकिलांनी सनद पडताळणीसाठी अर्जच दाखल केलेले नाहीत, असा त्याचा अर्थ होत असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPuneपुणे