शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने इंदापूरात खळबळ; तिसऱ्या आघाडीची तयारी, लक्ष पवारांच्या निर्णयाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:50 IST

आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम, पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना!

पुणे: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर होताच इंदापूर मध्ये तिसरी आघाडी निर्माण होऊन निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला त्याच ठिकाणी जनता मेळावा घेतला. गर्दीही जमवली पण त्यात ठोस भूमिकाच घेतली नाही. किंवा त्यानंतरही काहीच दिशाच ठरवली गेली नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीतील नेते शरद पवार यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. 

आप्पासाहेब जगदाळे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. परंतू एकदा आ.भरणे यांनी तर दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना भावनिक करुन, जगदाळे यांना उमेदवारीपासून वंचित ठेवले आहे. आपल्या सरळ स्वभावाचा फायदा त्यांनी घेतल्याचे जगदाळे यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. यंदा त्यांना निवडणूक लढवायची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची दोन शतके झाली. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे हे दोघे एकाकी पडल्यानंतर जगदाळे यांनी विनाअट शरद पवार यांना पाठींबा दिला. खा.सुप्रिया सुळे यांचा  हिरीरीने प्रचार ही केला. यंदाच्या निवडणुकीत त्याचा निश्चितपणे फायदा होईल असे त्यांना वाटले होते. मात्र इच्छुकांची गर्दी वाढली अन् त्यामध्ये भर म्हणून शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना आपल्याकडे ओढले. त्यामुळे जगदाळे यांच्या आकांक्षेवर पुन्हा एकदा पाणी पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

  या परिस्थितीत इच्छुकांच्या रेट्याने हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची रणनिती आप्पासाहेब जगदाळे यांनी आखली. त्यांना प्रवीण माने यांची साथ मिळाली. प्रवीण माने यांना ही यंदा विधानसभा निवडणूक लढवायची आहे. जगदाळे यांना व माने यांना मलाच उमेदवारी हवी आहे, असे थेट म्हणता येईना, अशी गोची होवून बसली आहे. शरद पवार यांनी या दोघांना ही आपली ताकद वाढवा. पक्ष संघटन अधिक मजबूत करा. भविष्यात तुम्हाला चांगली संधी नक्कीच मिळेल असे सांगितल्याची खात्रीशीर माहिती आहे. मात्र या दोघांना आ. दत्तात्रय भरणे ही नकोत अन् हर्षवर्धन पाटील त्याहून नको आहेत.    प्रवीण माने यांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी सुमारे ऐंशी गावात खा. सुप्रिया सुळे यांचा एकहाती प्रचार केला आणि प्रचाराला रीतसर प्रारंभ होण्याच्या एक दिवस आधी खा.सुनेत्रा पवार यांना पाठींबा दिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर परत ते शरद पवारांकडे आहे. ही जी धरसोडीची भूमिका घेतली ती शरद पवारांना आवडली नाही. हे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या टीकेवरुन स्पष्ट झाले होते. त्यांना उमेदवारी न देण्यामागे हीच बाब कारणीभूत असावी असा जाणकारांना वाटते आहे.    या तीन चार दिवसात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी आप्पासाहेब जगदाळे व प्रवीण माने यांची बैठक झाली. त्यानंतर पुण्यात शरद पवारांनी ही त्यांना बोलावून घेतले होते, असे सांगितले जात नाही. या दोघांनी ही त्यास दुजोरा दिला नाही. या पार्श्‍वभूमीवर जगदाळे व माने हे दोघे ही निवडणुक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे ही बोलले जात आहे. पण निवडणूक रिंगणात कोण उतरणार हेच ठरेना. त्यापेक्षही हे दोघेही शरद पवार यांच्या निर्णयाची वाट पाहत असल्याची चर्चाही सुरू आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत तिसरी आघाडी अस्तित्वात आहे की नाही  असा प्रश्नही  इंदापूरकरांमधून विचारला जाऊ लागला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४indapur-acइंदापूरvidhan sabhaविधानसभाharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस