शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोनामुळे यंदा घरोघरीच होणार 'हरित वारी' चा गजर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 07:20 IST

गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत ज्ञानेश्वरमहाराज वाबळे आणि त्यांचे वारकरी पर्यावरण दिंडी काढत आहेत.

ठळक मुद्देपर्यावरण दिंडीकडून वृक्षलागवड, निसर्गपाठाचे वाचन

श्रीकिशन काळेपुणे : कोरोनामुळे यंदा पालखी सोहळ्यातील पर्यावरण वारी घरीच रोपं लावून साजरी करण्यात येत आहे. दरवर्षी पर्यावरण दिंडीमध्ये शेकडो वारकरी सहभागी होऊन वृक्षलागवड करीत असतात. पण आता वारी नसल्याने या दिंडीतील वारकरी घरी आणि आजुबाजूच्या परिसरात रोपं लावून त्याची जोपासना करणार आहेत. 'हरित वारी, आपआपल्या घरी' याप्रमाणे ही वारी सुरू झाली आहे.

गेल्या अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत ज्ञानेश्वर महाराज वाबळे आणि त्यांचे वारकरी पर्यावरण दिंडी काढत आहेत. त्या दिंडीमधून ठिकठिकाणी वृक्षलागवड करणे, वारकऱ्यांमध्ये, ग्रामस्थांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत प्रबोधन करण्याचे काम केले जाते. या वषीर्ची पर्यावरण वारी जरा अनोखी आहे. वारकऱ्यांसोबतच नागरिक देखील यात सहभागी झाले आहेत.  वृक्षलागवड ही राष्ट्रभक्ती समजून कार्य करणारे कवी चंद्रकांत शहासने यांनी हरिपाठासारखे निसर्गपाठाची रचना केली आहे. रोप लावल्यानंतर त्यासमोर हा निसर्ग पाठ वाचू शकता. 'चला लावू झाडे, वाढवूया वने, टाळू सर्व चाळे, दुष्काळाचे.. ' अशाप्रकारे या निसर्गपाठाची सुरवात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून हा निसर्गपाठ वारकºयांपर्यंत पोचविण्यात येत आहे. हा उपक्रम वनअधिकारी रंगनाथ नाईकडे, श्रीपाद कोंडे, गायत्री कोंडे राबवत आहेत. याविषयी श्रीपाद कोंडे म्हणाले, यंदाची वारी हरित व्हावी, म्हणून प्रयत्न करायला हवा. वड, पिंपळ, कडूनिंब अशी देशी झाडं लावून निसर्ग संवर्धन करावे. हीच घरी यंदाची वारी असणार आहे.

घरीच फुलेल हरित वारीया हरित वारीसाठी घरी रोपं लावून ते वाढवावे, जपावे हा एक चांगला संदेश जात आहे. वृक्षलागवड केली जाते. पण नंतर लक्ष दिले जात नाही. पण या वारीत आषाढीपर्यंत रोपं चांगले वाढेल. नंतर इतरत्र कुठेही ते लावता येईल. तसेच घरातील कचरा हा कंपोस्ट खत म्हणून रोपाला घालता येईल. त्यातून रोपाची चांगली वाढ होईल. पायी वारी नसली, तरी ही हरित वारी करून विठ्ठलाला घरातून नमन करूया, अशा भावना पालखी सोहळ्यात सहभागी होणाºया अनुष्का कजबजे यांनी व्यक्त केल्या. त्यांनी देखील बाल्कनीत रोप लावले आहे.

यंदा गुळवेल वनस्पतीचे प्रबोधनयंदा पायी वारी नसली तरी घरोघरीच पर्यावरणाची वारी घडविणार आहोत. वारकरी आपल्या घरी, आजुबाजुला रोपं लावत आहेत. त्यातून ही पर्यावरणाची वारी फुलत राहील. गेली ४० वर्षांपासून आम्ही वारी करतोय. अकरा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत पर्यावरण दिंडी सुरू केली. आजपर्यंत १५ हजार रोपं लावली आहेत. यंदा गुळवेल मोठ्या प्रमाणात लावावे यासाठी प्रयत्न करत आहोत. कारण ही एक औषधी वनस्पती आहे. मधुमेह, थंडी, ताप अशा आजारांवर गुणकारी आहे. आमचे वारकरी ज्ञानेश्वर सांगळे आणि अजून बरेच आहेत, ते खूप रोपं लावण्यासाठी काम करतात. प्रत्येकाने झाड लावावे, त्याची जोपासना करावी आणि यंदाची ही वारी घरीच बसून साजरी करावी.- ज्ञानेश्वर महाराज वाबळे, पर्यावरण दिंडी  

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीenvironmentपर्यावरणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस