शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला

By नितीन चौधरी | Updated: May 8, 2023 17:59 IST

विरोधी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे

पुणे: सध्याचे कृषीमंत्री बांधावर दिसत नाहीत असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना बांध माहित असला असता तर आमदारांचा बांध फुटला नसता. ४० आमदार त्यांना सोडून गेले नसते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीक विमा देण्याचे ठरवले आहे. असा निर्णय राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हे त्यांना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझा इतका कोणताही कृषिमंत्री राज्यात फिरलेला नाही. त्यांचे दुखणे वेगळे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. 

“राज्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस हे आस्मानी संकट आहे. विरोधी पक्षांनी याचे राजकारण करू नये. याचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहेत,” अशी ग्वाही सत्तार यांनी दिली. तसेच पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतून चार हजार रुपयांचा हप्ता येत्या आठ दिवसांत जमा होईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

ते म्हणाले,“बदलत्या हवामानामुळे काही नवीन पीक पॅटर्न आणता येईल का, याकडे आमचे लक्ष आहे. कमी कालावधीचे पीक घेता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे. पाऊस कमी होणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यातही घट झाल्यास संकटाचा समाना करावा लागेल. मात्र, त्यात वाढही होण्याची शक्यता आहे. तरीदेखील शेतकरऱ्यांनी हवालदिल होण्याची गरज नाही. सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल.”

शेतकऱ्याची मुले अधिकारी व्हावेतच परंतु काहीही न झाल्यास किमान चांगला शेतकरी व्हावे यासाठी शाळांमधून कृषी विषय शिकविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला वेगळे स्वरुप देण्यात आले आहे. यात आता थेट लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारखीच राज्यानेही योजना राबविण्याचे ठरविले आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा केले जातील असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेAbdul Sattarअब्दुल सत्तारPoliticsराजकारण