शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला

By नितीन चौधरी | Updated: May 8, 2023 17:59 IST

विरोधी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे

पुणे: सध्याचे कृषीमंत्री बांधावर दिसत नाहीत असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना बांध माहित असला असता तर आमदारांचा बांध फुटला नसता. ४० आमदार त्यांना सोडून गेले नसते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीक विमा देण्याचे ठरवले आहे. असा निर्णय राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हे त्यांना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझा इतका कोणताही कृषिमंत्री राज्यात फिरलेला नाही. त्यांचे दुखणे वेगळे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. 

“राज्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस हे आस्मानी संकट आहे. विरोधी पक्षांनी याचे राजकारण करू नये. याचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहेत,” अशी ग्वाही सत्तार यांनी दिली. तसेच पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतून चार हजार रुपयांचा हप्ता येत्या आठ दिवसांत जमा होईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

ते म्हणाले,“बदलत्या हवामानामुळे काही नवीन पीक पॅटर्न आणता येईल का, याकडे आमचे लक्ष आहे. कमी कालावधीचे पीक घेता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे. पाऊस कमी होणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यातही घट झाल्यास संकटाचा समाना करावा लागेल. मात्र, त्यात वाढही होण्याची शक्यता आहे. तरीदेखील शेतकरऱ्यांनी हवालदिल होण्याची गरज नाही. सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल.”

शेतकऱ्याची मुले अधिकारी व्हावेतच परंतु काहीही न झाल्यास किमान चांगला शेतकरी व्हावे यासाठी शाळांमधून कृषी विषय शिकविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला वेगळे स्वरुप देण्यात आले आहे. यात आता थेट लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारखीच राज्यानेही योजना राबविण्याचे ठरविले आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा केले जातील असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेAbdul Sattarअब्दुल सत्तारPoliticsराजकारण