शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:13 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे...

बारामती :अजित पवार यांच्याऐवजी मला राजकारणात संधी दिली गेली असती तर आज जी परिस्थिती दिसते, ती तेव्हाच निर्माण झाली असती, असे मत आमदार रोहित पवार यांचे वडील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचे वडील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी एका वाहिनीशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, लोकांच्या भावना दाबल्या जात असतील तर त्या निनावी पत्राच्या रूपाने बाहेर पडतात, यासंबंधी निनावी पत्राला फारसे महत्त्व नसते. परंतु, काही वेळा लोकांच्या भावना दाबल्या जात असतील तर त्या अशा पत्राद्वारे बाहेर येतात. त्याच पद्धतीने कोणा बारामतीकराच्या भावना यातून पुढे आल्या असतील.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याऐवजी तुम्हाला राजकारणात संधी दिली असती तर काय घडले असते, या प्रश्नावर राजेंद्र पवार म्हणाले, त्यावेळी स्व. आप्पासाहेब पवार हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पॅनेलप्रमुख होते. त्यांनी अजित पवार यांना संधी दिली. मी शेती व व्यवसाय बघत होतो. पुढे शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते राजकीय क्षेत्रात आले. तद्नंतरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत मी दोनदा रस दाखवला. परंतु, शरद पवार यांनी मला या क्षेत्रात जाऊ नये, असे सांगितले. ते प्रमुख असल्याने त्यांचा तो विचार किंवा आदेश मी मानला. तो त्यांचा राजकीय निर्णय होता. त्यांना राजकारण अधिक चांगल्या पद्धतीने समजते. त्या काळात कदाचित मी राजकारणात आलो असतो, तर आज जी परिस्थिती दिसते आहे त्याची सुरुवात तेव्हाच दिसली असती. परंतु, जे काही झाले ते चांगलेच झाले. त्यामुळे मला शेती, सामाजिक कार्यात लक्ष देता आले. व्यवसायाचे बस्तान बसवता आले. रोहित पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांना त्याचा फायदा झाला.

वाद होऊ नये म्हणूनच तो निर्णय

पवार कुटुंबातील खदखद रोहित पवार यांना आमदारकीची संधी दिल्यापासून वाढली का, या प्रश्नावर ते म्हणाले, पण मला असे वाटत नाही. पवार घराण्यात काय चालते काय नाही, हे लोकांना डोकावून पाहायला आवडते. परंतु त्यांना वस्तुस्थिती माहीत नसते. पार्थ पवार हे खासदारकीसाठी मावळमधून उभे राहिले होते. पिंपरी चिंचवड भागात त्यांचा वावर असतो. त्यामुळे ते तिकडे उभे राहिले. रोहित पवार यांचा इंटरेस्ट असता तर ते बारामतीतून उभे राहिले असते. तसे न करता त्यांनी कर्जत-जामखेडला जाऊन तो मतदारसंघ तयार केला. वाद होऊ नये, त्यामागे हीच भूमिका असल्याचे राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच सामना होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत राजेंद्र पवार म्हणाले, ही बाब आमच्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे. बारामतीकर गेल्या ५० वर्षांपासून पवार कुटुंबीयांच्या सोबत आहेत. आता जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल त्यावेळी त्यांच्यावर एखाद्याने दबाव टाकला, तर त्याचे मानसिक दडपण बारामतीकरांना येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती