शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 11:13 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे...

बारामती :अजित पवार यांच्याऐवजी मला राजकारणात संधी दिली गेली असती तर आज जी परिस्थिती दिसते, ती तेव्हाच निर्माण झाली असती, असे मत आमदार रोहित पवार यांचे वडील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचे वडील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी एका वाहिनीशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, लोकांच्या भावना दाबल्या जात असतील तर त्या निनावी पत्राच्या रूपाने बाहेर पडतात, यासंबंधी निनावी पत्राला फारसे महत्त्व नसते. परंतु, काही वेळा लोकांच्या भावना दाबल्या जात असतील तर त्या अशा पत्राद्वारे बाहेर येतात. त्याच पद्धतीने कोणा बारामतीकराच्या भावना यातून पुढे आल्या असतील.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याऐवजी तुम्हाला राजकारणात संधी दिली असती तर काय घडले असते, या प्रश्नावर राजेंद्र पवार म्हणाले, त्यावेळी स्व. आप्पासाहेब पवार हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पॅनेलप्रमुख होते. त्यांनी अजित पवार यांना संधी दिली. मी शेती व व्यवसाय बघत होतो. पुढे शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते राजकीय क्षेत्रात आले. तद्नंतरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत मी दोनदा रस दाखवला. परंतु, शरद पवार यांनी मला या क्षेत्रात जाऊ नये, असे सांगितले. ते प्रमुख असल्याने त्यांचा तो विचार किंवा आदेश मी मानला. तो त्यांचा राजकीय निर्णय होता. त्यांना राजकारण अधिक चांगल्या पद्धतीने समजते. त्या काळात कदाचित मी राजकारणात आलो असतो, तर आज जी परिस्थिती दिसते आहे त्याची सुरुवात तेव्हाच दिसली असती. परंतु, जे काही झाले ते चांगलेच झाले. त्यामुळे मला शेती, सामाजिक कार्यात लक्ष देता आले. व्यवसायाचे बस्तान बसवता आले. रोहित पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांना त्याचा फायदा झाला.

वाद होऊ नये म्हणूनच तो निर्णय

पवार कुटुंबातील खदखद रोहित पवार यांना आमदारकीची संधी दिल्यापासून वाढली का, या प्रश्नावर ते म्हणाले, पण मला असे वाटत नाही. पवार घराण्यात काय चालते काय नाही, हे लोकांना डोकावून पाहायला आवडते. परंतु त्यांना वस्तुस्थिती माहीत नसते. पार्थ पवार हे खासदारकीसाठी मावळमधून उभे राहिले होते. पिंपरी चिंचवड भागात त्यांचा वावर असतो. त्यामुळे ते तिकडे उभे राहिले. रोहित पवार यांचा इंटरेस्ट असता तर ते बारामतीतून उभे राहिले असते. तसे न करता त्यांनी कर्जत-जामखेडला जाऊन तो मतदारसंघ तयार केला. वाद होऊ नये, त्यामागे हीच भूमिका असल्याचे राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच सामना होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत राजेंद्र पवार म्हणाले, ही बाब आमच्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे. बारामतीकर गेल्या ५० वर्षांपासून पवार कुटुंबीयांच्या सोबत आहेत. आता जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल त्यावेळी त्यांच्यावर एखाद्याने दबाव टाकला, तर त्याचे मानसिक दडपण बारामतीकरांना येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती