शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

Supriya Sule: आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 16:50 IST

अक्षय शिंदेसारख्या नराधमावर फास्टट्रॅक द्वारे खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी माझी भुमिका होती

बारामती: बदलापुर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता. कारण हा देश संविधानाने चालतो. कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. हे खूप चिंताजनक आहे, ज्याचा चेहरा पूर्ण काळा कापडाने झाकला होता. त्याच्या हातात बेड्या होत्या. मग तो बंदुकीपर्यंत पोहोचलाच कसा, त्याने पोलिसांवर अटॅक केला कसा, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या ‘एन्काउंटर’प्रकरणाचे ‘इन्क्वायरी’ करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

बारामती येथे आयोजित पत्रकार परीषदेत सुळे यांनी अक्षय च्या एन्काउंटर प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. सुळे म्हणाल्या, आपला देश कोणाच्या मर्जीने चालत नाही, संविधानाने चालतो. संविधानामध्ये हि कृती बसत नाही. महाराष्ट्रात ‘एन्काऊंटर’ शब्द ऐकलेला नाही. हा एन्काऊंटर आहे का, याबाबत स्पष्टता करावी. त्याचा चेहरा काळा कपड्याने झाकलं होत, त्याचे हात बांधले होते, मग तो बंदुकी पर्यंत पोहोचला कसा,पोलीसांना गोळी लागली कशी, एन्काऊंटर झाला कसा हाच मोठा प्रश्न मला पडला आहे. सरकारने हा खटला फास्टट्रॅकद्वारे चालवून जाहिररीत्या आरोपीला फाशी देण्याची ‘कमिटमेंट’ सरकारने केली होती. या प्रकरणी ‘एफ आय आर’ ला किती आणि का वेळ लागला,याची सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील,यापासून सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला आहे.

या सरकारने पक्ष फोडले , घर फोडल, इन्कम टॅक्स सीबीआय इडीच्या नोटीसा पाठविल्या एवढंच केले. कोणतेही ठोस कामे केली नाहीत. सरकारकडे सांगण्यासारखं काही नाही.त्यामुळे प्रत्येक ‘कॅबिनेट‘ला पंधरा दिवसाला नविन निर्णय घेण्यासारखा ‘गतिमान‘ सरकारला उत्साह कसा आला, असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला.

बदलापुर अत्याचार प्रकणातील अक्षय शिंदेची काळजी नाही. उलट सरकारला माझी विनंती होती, त्याच्या नराधमांना फास्टट्रॅक द्वारे खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे. त्यामुळे अशा नराधमांवर वचक बसला पाहिजे, अशी माझी भुमिका होती. मात्र, पोलीस कस्टडीत असलेला माणूस बंदुकी पर्यंत पोहोचलाच कसा पोलीसांना गोळी लागलीच कशी, ही चिंताजनक परिस्थिती आहे. या राज्यात पोलीस देखील सुरक्षित नाहीत. हा हल्ला झालाच कसा, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारणPoliceपोलिस