शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Supriya Sule: आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 16:50 IST

अक्षय शिंदेसारख्या नराधमावर फास्टट्रॅक द्वारे खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे, अशी माझी भुमिका होती

बारामती: बदलापुर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता. कारण हा देश संविधानाने चालतो. कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. हे खूप चिंताजनक आहे, ज्याचा चेहरा पूर्ण काळा कापडाने झाकला होता. त्याच्या हातात बेड्या होत्या. मग तो बंदुकीपर्यंत पोहोचलाच कसा, त्याने पोलिसांवर अटॅक केला कसा, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या ‘एन्काउंटर’प्रकरणाचे ‘इन्क्वायरी’ करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

बारामती येथे आयोजित पत्रकार परीषदेत सुळे यांनी अक्षय च्या एन्काउंटर प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. सुळे म्हणाल्या, आपला देश कोणाच्या मर्जीने चालत नाही, संविधानाने चालतो. संविधानामध्ये हि कृती बसत नाही. महाराष्ट्रात ‘एन्काऊंटर’ शब्द ऐकलेला नाही. हा एन्काऊंटर आहे का, याबाबत स्पष्टता करावी. त्याचा चेहरा काळा कपड्याने झाकलं होत, त्याचे हात बांधले होते, मग तो बंदुकी पर्यंत पोहोचला कसा,पोलीसांना गोळी लागली कशी, एन्काऊंटर झाला कसा हाच मोठा प्रश्न मला पडला आहे. सरकारने हा खटला फास्टट्रॅकद्वारे चालवून जाहिररीत्या आरोपीला फाशी देण्याची ‘कमिटमेंट’ सरकारने केली होती. या प्रकरणी ‘एफ आय आर’ ला किती आणि का वेळ लागला,याची सरकारला उत्त्तरे द्यावी लागतील,यापासून सरकारला सुट्टी नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला आहे.

या सरकारने पक्ष फोडले , घर फोडल, इन्कम टॅक्स सीबीआय इडीच्या नोटीसा पाठविल्या एवढंच केले. कोणतेही ठोस कामे केली नाहीत. सरकारकडे सांगण्यासारखं काही नाही.त्यामुळे प्रत्येक ‘कॅबिनेट‘ला पंधरा दिवसाला नविन निर्णय घेण्यासारखा ‘गतिमान‘ सरकारला उत्साह कसा आला, असा टोला यावेळी सुळे यांनी लगावला.

बदलापुर अत्याचार प्रकणातील अक्षय शिंदेची काळजी नाही. उलट सरकारला माझी विनंती होती, त्याच्या नराधमांना फास्टट्रॅक द्वारे खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे. त्यामुळे अशा नराधमांवर वचक बसला पाहिजे, अशी माझी भुमिका होती. मात्र, पोलीस कस्टडीत असलेला माणूस बंदुकी पर्यंत पोहोचलाच कसा पोलीसांना गोळी लागलीच कशी, ही चिंताजनक परिस्थिती आहे. या राज्यात पोलीस देखील सुरक्षित नाहीत. हा हल्ला झालाच कसा, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारणPoliceपोलिस