शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

गुऱ्हाळाचे प्रदूषण; गुलछडीचे पीक जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:22 IST

कासुर्डी (ता. दौंड) येथील शेतकऱ्याचे ऐन जोमात आलेले गुलछडीचे पीक गुºहाळाच्या प्रदूषित धुरामुळे जळून गेले आहे

यवत : कासुर्डी (ता. दौंड) येथील शेतकऱ्याचे ऐन जोमात आलेले गुलछडीचे पीक गुºहाळाच्या प्रदूषित धुरामुळे जळून गेले आहे. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सद्य:परिस्थितीत पावसाळा असल्याने गुºहाळचालक भट्टीत सर्रास पाचटाबरोबर रबर, प्लॅस्टिक व इतर कचरा जाळत आहेत. यामुळे पर्यावरणाचीदेखील मोठी हानी होत आहे.

कासुर्डी येथील जावजीबुवाची वाडी महसूल गाव अंतर्गत गट नं. २०७ मध्ये बाळासाहेब लक्ष्मणराव आखाडे यांची शेती आहे. त्यांनी शेतात गुलछडीचे पीक घेतले होते. ऐन गणेशउत्सव व सणासुदीच्या काळात गुलछडीच्या फुलांना चांगला बाजार मिळत असतो. यामुळे या भागातील शेतकरी मोठे कष्ट करून, या दिवसांमध्ये जोमदार पीक आणतात. बाळासाहेब आखाडे यांनी देखील मोठ्या कष्टाने गुलछडीचे पीक वाढविले होते. त्यांच्या शेतीच्या बाजूला मागील काही वर्षांपासून गुळाचे गुºहाळ सुरू झाले आहे. मात्र, गुºहाळच्या भट्टीसाठी पाचट वापरून सदर धूर योग्य उंचीवर सोडल्यास याचा त्रास कमी असतो. यंदा बाजूच्या गुºहाळचालकाने पाऊस सुरू झाल्यानंतर, पाचटाबरोबर रबर, प्लास्टिक आदी घातक कचरा जाळल्याने दोनच दिवसांत गुलछडीचे पीक अक्षरश: जळून गेले. काही कळण्याच्या आतच वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले.

याबाबत, त्यांनी लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधून माहिती दिली. सदरबाबत ते तहसीलदार दौंड यांच्याकडे तक्रार अर्ज करणार असून पिकाचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तसेच, याबाबत प्रशासकीय पातळीवर तातडीने कारवाई न झाल्यास कुटुंबासह उपोषण करणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.पर्यावरणासाठीदेखील घातक...कोणताही व्यवसाय करायचा झाल्यास प्रदूषण होऊ नये यासाठी व्यावसायिकाला अनेक प्रशासकीय मंजुºया व काळजी घ्यावी लागते. मात्र, दौंड तालुक्यात शेकडो गुळाची गुºहाळे सर्व नियम धाब्यावर बसवून चालविली जात आहेत.गुºहाळच्या भट्ट्यांमध्ये रबर प्लास्टिक आदी घातक गोष्टी जाळल्याने काळ्या धुराचे मोठे लोट आजूबाजूला मोठे प्रदूषण करत असतात. यामुळे आजूबाजूची शेती अडचणीत उलट असून अशा प्रदूषणकारी गुºहाळांवर प्रशासनाने कारवाई करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने