शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

हिरव्यागार डोंगररांगा, बरसणाऱ्या सरी अन्‌ शीतल गारवा, बाराही महिने श्रावणच हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:00 IST

‘श्रावण’ नुसतं नाव उच्चारलं तरी मनात आनंदाची एक झुळूक उमटते. हिरव्यागार डोंगररांगा, नभातून बरसणाऱ्या सरी, शीतल गारवा अशी सुखद अनुभूती देणारा श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होत आहे.

कृष्णकुमार गोयलअध्यक्ष, कोहिनूर ग्रुप आणि उपाध्यक्ष, पुणे फेस्टिव्हलहिंदू आणि जैन धर्मात श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. फुललेला निसर्ग, सर्वत्र बहरलेली हिरवाई, पवित्र सणांची रेलचेल, शाकाहाराचा उद्घोष, चातुर्मास अशा अनेक बाबींमुळे श्रावण महिना पवित्र मानला जातो. हसरा, फुललेला, सुगंधाने गंधीत झालेला आणि तनामनात एक चैतन्याची लाट फुलविणारा हा ‘श्रावण’ प्रत्येकाच्या मनाला व्यापून टाकतो. त्याची चाहूल लागते ती आकाशात उमटणाऱ्या इंद्रधनुष्याच्या कमानीने, तर कधी ढगाआडून हसलेल्या उन्हामुळे! .

श्रावणातील पावसाची सर ही जणू मनात एक आनंदगीतच गात येत असते. श्रावणाची असंख्य मराठी भावगीते रसिकांच्या मनावर रुंजी घालतात, तशीच अन्य भारतीय भाषांमध्येही ‘सावन’च्या गीतांचा खजिना अनुभवास मिळतो. मराठी मनाला लता मंगेशकरांनी गायलेलं ‘श्रावणात घन निळा बरसला...’ आजही चिरतरुण वाटतं, तर हिंदी सिनेमांमध्ये ‘सावन’वर आधारित असंख्य गीतं आजही मनात घर करून आहेत.

श्रावणात येणारे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, दहीहंडी, पोळा, मंगळागौर - हे केवळ उत्सव नाहीत, तर संस्कृतीची आठवण करून देणारे सोहळे आहेत. प्रत्येक सणात नात्यांची गोडी, परंपरेची जोड आणि आनंदाची उधळण असते. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करणे महाराष्ट्रात प्रचलित आहे. श्रावणी सोमवारी श्री शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा तर प्रत्येकाच्या श्रद्धेचाच भाग. या दिवशी कोट्यवधी भाविक उपवास करतात. उत्तर भारतात लाखो लोक पायी कावड घेऊन जात धर्म श्रद्धेची आराधना करतात. असा हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा श्रावण महिना जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तामिळनाडूत ‘अवनी’, बंगालमध्ये ‘श्राबोन’ अशा विविध नावांनी श्रावण महिन्याचा उल्लेख होतो. श्रावण हा वर्षा ऋतूचा दुसरा महिना असतो.

श्रावण महिन्यात पडणाऱ्या जलधारांनी नद्या भरून वाहतात, तळी-विहिरी व धरणे पाण्याने भरतात. जमिनीखाली पाणी मुरत राहते, त्यामुळे भूगर्भजल पातळी वाढते. शेतीतील खरीप पिकांना हा पाऊस म्हणजे वरदानच असतो. वृक्ष, वेली, शेती, फळझाडे, फुले या साऱ्यांनाच बहर येत असतो. निसर्गातील प्राणी व पक्ष्यांना तृप्त ठेवणारा हा श्रावण महिना असतो. या काळात अनेक भक्त मांसाहार टाळून शाकाहाराचा स्वीकार करतात. जणू सृष्टीला नवं बळ मिळतं.

चातुर्मासाचा कालखंडही हाच असतो. जैन धर्मीयांमध्ये सर्वत्र विहार करणारे साधुसंत, मुनी, आचार्य, साध्वी एका ठिकाणी साधना करतात. वातावरणात शांतता आणि अध्यात्म भरून राहतो. या चातुर्मास काळात लाखो भक्त श्रद्धेने दर्शनासाठी येतात.

श्रावण हा केवळ एक ऋतू नाही - तो निसर्ग, अध्यात्म, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे. तो जीवनात चैतन्य, उमेद आणि समाधान फुलवतो. म्हणूनच वाटतं - दर महिना श्रावण असावा, दरक्षणी मनात श्रावण रुंजी घालावा !

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र