शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ग्रामसुधार सदिच्छा दूताला परीक्षेचा मुहूर्त; राष्ट्रीय सेवा योजना, २ महिन्यांचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 12:45 IST

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे.

ठळक मुद्देअमृता करवंदे यांनी ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून निवड केल्याबद्दल सरकारचे मानले आभार शासनाने माझा नाही तर या देशातील सर्व अनाथांचा आणि वंचिताचा गौरव केला : करवंदे

पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या प्रसारासाठी राज्य सरकारने सदिच्छा दूताची नेमणूक केली असून, त्यासाठी चक्क परीक्षा हंगामाचा मुहूर्त काढला आहे. विशेष म्हणजे, त्यांचा कालावधी २०१७-१८ या शैक्षणिक कालावधीपुरता आहे. हा कालावधी संपण्यास दोन ते तीन महिनेच उरले आहेत; त्यामुळे ही नियुक्ती कागदोपत्रीच ठरण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी २६ सप्टेंबर २०१७ला शाासन निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नवेली देशमुख आणि महाराष्ट्र लोकसेवा अयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अमृता करवंदे यांची निवड करण्यात येणार होती. त्यानुसार त्यांची ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केल्याचा शासन निर्णय मंगळवारी (दि. ६) प्रसिद्ध करण्यात आला. विनामानधन तत्त्वावर ही नियुक्ती असेल. याअंतर्गत विद्यार्थी व युवकांशी संवाद साधणे, राष्ट्रीय सेवा योजनेने घेतलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करणे अशी कामे या दूतांना करावी लागतील. तसा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम समन्वयक, तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक यांची असेल. त्यांच्या प्रवास आणि निवासाची व्यवस्था संबंधित विद्यापीठ करेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या दूतांचा कालावधी हा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी असेल. मार्च महिन्यात शैक्षणिक वर्ष संपुष्टात येईल, तसेच सध्या परीक्षांचा हंगामदेखील सुरू असल्याने या दूतांना कोणतेच काम करता येणार नाही.  

अनाथांचा गौरवसदिच्छादूत अमृता करवंदे यांनी ग्रामसुधार सदिच्छा दूत म्हणून निवड केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. ‘शासनाने माझा नाही तर या देशातील सर्व अनाथांचा आणि वंचिताचा गौरव केला आहे. मी अनाथांचे प्रश्न घेऊन सरकारदरबारी जाणारी एक सामान्य मुलगी आहे. आमच्या मागणीची दखल घेणे आणि माझी सदिच्छा दूत म्हणून निवड करणे हा आमचा सामूहिक सन्मान आहे. सरकारने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करीन,’ अशी प्रतिक्रिया करवंदे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे